शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नांद्राकोळीच्या २0 जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 11, 2016 02:53 IST

अविश्‍वास प्रस्ताव प्रकरणी नऊ जणांना जामीन मिळाला.

बुलडाणा : तालुक्यातील नांद्राकोळीचे सरपंच यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव सभेसाठी आलेल्या ८ ग्रामपंचायत सदस्यांवर तसेच उपस्थित पोलिसांवर सरपंच सर्मथकांनी हल्ला केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरा २0 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी ९ लोकांना अटक करण्यात आली. नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्यांनी डॉ. हरिदास रामकृष्ण काळवाघे यांना सरपंच म्हणून निवडले. मात्र, सरपंच काळवाघे अन्य ग्रा.पं. सदस्यांना विश्‍वासात न घेता, मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत नांद्राकोळी येथील १0 ग्रा.पं. सदस्यांनी बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव सादर केला. तहसीलदार बाजड यांनी अविश्‍वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले. निर्धारित वेळेच्या १0 मिनिटाआधी या सभेत सहभागी होण्यासाठी एमएच २८ व्ही ६१६७ क्रमांकाच्या क्रुझर जीपने ८ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भवनात पोहोचले. दरम्यान, तेथे उपस्थितीत सरपंच सर्मथकांनी जीपवर हल्ला करून आत बसलेल्या ग्रा.पं. सदस्यांना मारहाण करणे सुरू केले. बचावासाठी पोलीस कर्मचारी धावले असता, त्यांनाही सर्मथकांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस पथकासह गावात दाखल झाले. या प्रकरणी काल रात्री उशिरा ग्रामपंचायत सदस्य मनोज सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी सरपंच डॉ.हरिदास काळवाघे, मंगला तायडे यांच्यासह २0 लोकांवर भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३६३, ४४७, ४२७, ३२३, ५0६ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.