शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नांद्राकोळीच्या २0 जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 11, 2016 02:53 IST

अविश्‍वास प्रस्ताव प्रकरणी नऊ जणांना जामीन मिळाला.

बुलडाणा : तालुक्यातील नांद्राकोळीचे सरपंच यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव सभेसाठी आलेल्या ८ ग्रामपंचायत सदस्यांवर तसेच उपस्थित पोलिसांवर सरपंच सर्मथकांनी हल्ला केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरा २0 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी ९ लोकांना अटक करण्यात आली. नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्यांनी डॉ. हरिदास रामकृष्ण काळवाघे यांना सरपंच म्हणून निवडले. मात्र, सरपंच काळवाघे अन्य ग्रा.पं. सदस्यांना विश्‍वासात न घेता, मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत नांद्राकोळी येथील १0 ग्रा.पं. सदस्यांनी बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव सादर केला. तहसीलदार बाजड यांनी अविश्‍वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले. निर्धारित वेळेच्या १0 मिनिटाआधी या सभेत सहभागी होण्यासाठी एमएच २८ व्ही ६१६७ क्रमांकाच्या क्रुझर जीपने ८ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भवनात पोहोचले. दरम्यान, तेथे उपस्थितीत सरपंच सर्मथकांनी जीपवर हल्ला करून आत बसलेल्या ग्रा.पं. सदस्यांना मारहाण करणे सुरू केले. बचावासाठी पोलीस कर्मचारी धावले असता, त्यांनाही सर्मथकांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस पथकासह गावात दाखल झाले. या प्रकरणी काल रात्री उशिरा ग्रामपंचायत सदस्य मनोज सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी सरपंच डॉ.हरिदास काळवाघे, मंगला तायडे यांच्यासह २0 लोकांवर भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३६३, ४४७, ४२७, ३२३, ५0६ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.