शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अंनिसकडून न्यायालयाचा अवमान; निव्वळ पब्लिसिटी  स्टंट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:24 IST

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू  नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या  सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे  उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत  असून, हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून,  साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ पब्लिसिटी  मिळविण्याचा खटाटोप असल्याचे प्रत्युत्तर विवेकानंद  आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी  पत्रकार परिषद घेऊन दिले.

ठळक मुद्देशुकदास महाराजांवरील आरोपांना विवेकानंद आश्रमाकडून  प्रत्युत्तर अपशकून केल्यापेक्षा संमेलनाला या! 

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू  नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या  सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे  उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत  असून, हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून,  साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ पब्लिसिटी  मिळविण्याचा खटाटोप असल्याचे प्रत्युत्तर विवेकानंद  आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी  पत्रकार परिषद घेऊन दिले.९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे  आयोजित करणे निश्‍चित झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समि तीने आयोजक विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांना  विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी उत्तर दिले.  पत्रकार परिषदेत संतोष गोरे म्हणाले, की  कोट्यवधी  व्याधीग्रस्तांना अँलोपॅथीसारख्या अतिउच्च चिकित्सापद्ध तीद्वारे व्याधीमुक्त करणारे कुशल शुकदास महाराज यांनी आ पले जीवन व्यतीत केले. त्यांनी कधीही कुणाचे शोषण केले  नाही, फसवणूक केली नाही. धर्माच्या नावाने अंधश्रद्धेला  खतपाणी घातले नाही. वेदान्त आणि विज्ञान यांची सांगड  घालून त्यांनी आरोग्य, दीन-दलित, पीडितांची सेवा,  कृषीविकास, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात  डोंगराएवढे काम उभे केले. विवेकानंद आश्रमाच्या रूपाने या  क्षेत्रात संस्थात्मक काम केले जात असून, दरिद्री, पीडित,  रोगी, हेच आमचे देव आहेत. या देवाची सेवा करणे हाच  महाराजांनी घालून दिलेला आमच्या पुढचा आदर्श आहे.  त्याच आदर्शावर पूज्यनीय महाराजांनी वाटचाल केली. संस् था त्याच आदर्शावर वाटचाल करत आहे, असा विश्‍वासही  गोरे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, की सहदिवाणी न्यायाधीश, अकोला यांनी  १५ डिसेंबर २00१ च्या विवेकानंद आश्रमाच्या याचिकेवरील  निकालात ठळकपणे शुकदास महाराज अथवा विवेकानंद  आश्रमाविरोधात कोणत्याही हेतूने, कोणत्याही माध्यमांद्वारे  बदनामीकारक वक्तव्ये करू नये, असा मनाई हुकूम जारी  केलेला आहे. यापूवीर्ही दोन वेळा आपण अशाप्रकारे  पूज्यनीय महाराजांवर चिखलफेक करणारे, त्यांचे  चारित्र्यहनन करणारे आरोप केले आहेत. या आरोपांना आ पणाकडून ‘भंडाफोड’ असे म्हणण्यात येत आहे.  सहदिवाणी न्यायालयाचा आदेश आमच्या बाजूने अस तानाही होत असलेल्या आरोपांकडे आम्ही जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करत आलोत; परंतु आता जेव्हा ९१ वे अखिल भार तीय साहित्य संमेलन विवेकानंद आश्रमात आयोजित करणे  प्रस्तावित आहे. यावेळी करण्यात आलेले आरोप हा  न्यायालयाचा अवमान असून, आपणाविरोधात न्यायालयीन  अवमाननेची याचिका कोर्टात दाखल करण्यात येणार आहे,  असा इशाराही गोरे यांनी दिला आहे.

अपशकून केल्यापेक्षा संमेलनाला या! विवेकानंद आश्रम आणि साहित्यरसिक हा सोहळा यशस्वी  करण्यासाठी सर्मथ आहेत. श्याम मानव व त्यांच्या  सहकार्‍यांनी चांगल्या कार्याला अपशकून करणे सोडून द्यावे.  स्वत: मानव व त्यांच्या सहकार्‍यांना या साहित्य संमेलनाचे  सहर्ष निमंत्रण देत आहोत. त्यांनी सारस्वतांच्या या प्रांगणात  आणि पूज्यनीय शुकदास महाराजांच्या तपोभूमीत आवर्जुन  यावे, साहित्यरसिकता अनुभवावी, असेही संतोष गोरे  म्हणाले.