शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचा पेरा वाढणार !

By admin | Updated: May 15, 2014 00:39 IST

सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व मिळालेला भाव यामधील तफावत पाहता कपाशी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल असेल

संग्रामपूर : मान्सूनपूर्व पीक नियोजनामध्ये तालुका कृषी विभागाकडून सोयाबीनचा पेरा वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व हातात मिळालेला भाव यामधील तफावत पाहता या भागात ऐनवेळी कपाशी पिकाकडे शेतकर्‍यांचा जास्तीचा कल असेल अशी जाणकारांमधून चर्चा होत आहे. तर भेंडवळ मांडणीमध्ये पावसाचे भाकीत पाहता यंदाचे वर्ष ही शेतकर्‍यांसाठी फटका देणारे ठरणार का? अशी चिंताही व्यक्त होत आहे. कृषी विभागाकडून यंदाच्या खरीप पिकाच्या पेरणीचा अहवाल नुकताच तयार केला. त्यामध्ये कपाशीचा पेरा घटणार अशी शक्यता दाखवली. परंतु हा अंदाज उलट होण्याची लक्षणे आतापासून बाजारातील शेतकर्‍यांच्या चर्चेवरून दिसत आहेत. गेल्या हंगामात पावसाने कहर केल्याने कपाशीसह सोयाबीन पिकाला फटका बसला. सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने बर्‍याच सोयाबीनची गुणवत्ता बिघडली. परिणामी अशा गुणवत्ता घसरलेल्या सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळाले. सुरूवातीला २७00 रूपयांपासून तर तीन हजार रूपये क्विंटलने विक्री झालेले सोयाबीन सर्वाधिक होते. त्यानंतर बाजारात तेजी आली मात्र याचा फायदा साठवणुकदारच घेऊ शकले. यामध्ये शेतकर्‍यांकडे साठवण क्षमता नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने सोयाबीनमध्ये आर्थिक बजेट लागला नाही. कपाशीमध्ये कोरडवाहू शेतकरीही बरे प्रमाणात उत्पादन घेऊ शकले. कारण नंतरचा पाऊस हा कपाशीसाठी पोषक ठरल्याने फर्दळने अनेकांचा आर्थिक फायदा करून दिला व फर्दळ चार हजार रूपयांचेवर भाव देऊन गेल्याने सोयाबीन पेरणी करणारा पश्‍चाताप करताना दिसत होता. म्हणूनच यंदाच्या हंगामात निव्वळ सोयाबीनच्या नांदात अडकल्यापेक्षा कपाशी पेरलेली बरी, हाच विचार प्रत्येकाच्या मनात येत असल्याचे दिसत आहे. परंतु कृषी विभागाने गत वर्षीच्या हंगामानुसार काढलेला अंदाज सोयाबीन पिकावर भर देणारा ठरत आहे. त्यामध्ये ४४ हजार ७00 हेक्टरपैकी कपाशी १३ हजार ३६२ हेक्टर, सोयाबीन १७ हजार ५४१ हेक्टर, ज्वारी ३ हजार हेक्टर, मका १८00 हेक्टर, तूर ३ हजार ६00 हेक्टर, मुंग ३ हजार ३00 हेक्टर, उडीद २ हजार हेक्टर तर बाजरी पूर्णत: बाद दाखविण्यात आली आहे. या अंदाजाला सोयाबीनच्या बियाण्याची वाढीव किंमत मोठा अडथळा ठरू शकते. कारण ३0 किलो सोयाबीन ज्यांनी ९00 रूपयात विकले तेच ३0 किलो २७00 रूपयात मिळत असल्याने ऐनवेळी निर्णय बदल होण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या एका बॅगमध्ये जेवढे क्षेत्र पेरणी होते त्यापेक्षा जास्त क्षेत्र कपाशीचे होते. तेवढय़ाच पैशात व खतासह असा आर्थिक बजेट लक्षात घेता कपाशी पिकाचा पेरा वाढण्याचा अंदाज जाणकारांचा आहे. सोबतच यंदाची नैसर्गिक स्थिती लक्षात घेता कपाशी पिकाकडे वळणार्‍यांची संख्या वाढणार आहे.