शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

कापसाचा पेरा वाढणार !

By admin | Updated: May 15, 2014 00:39 IST

सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व मिळालेला भाव यामधील तफावत पाहता कपाशी पिकाकडे शेतकर्‍यांचा कल असेल

संग्रामपूर : मान्सूनपूर्व पीक नियोजनामध्ये तालुका कृषी विभागाकडून सोयाबीनचा पेरा वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर सोयाबीन बियाण्याच्या वाढत्या किंमती व हातात मिळालेला भाव यामधील तफावत पाहता या भागात ऐनवेळी कपाशी पिकाकडे शेतकर्‍यांचा जास्तीचा कल असेल अशी जाणकारांमधून चर्चा होत आहे. तर भेंडवळ मांडणीमध्ये पावसाचे भाकीत पाहता यंदाचे वर्ष ही शेतकर्‍यांसाठी फटका देणारे ठरणार का? अशी चिंताही व्यक्त होत आहे. कृषी विभागाकडून यंदाच्या खरीप पिकाच्या पेरणीचा अहवाल नुकताच तयार केला. त्यामध्ये कपाशीचा पेरा घटणार अशी शक्यता दाखवली. परंतु हा अंदाज उलट होण्याची लक्षणे आतापासून बाजारातील शेतकर्‍यांच्या चर्चेवरून दिसत आहेत. गेल्या हंगामात पावसाने कहर केल्याने कपाशीसह सोयाबीन पिकाला फटका बसला. सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने बर्‍याच सोयाबीनची गुणवत्ता बिघडली. परिणामी अशा गुणवत्ता घसरलेल्या सोयाबीनला बाजारात कमी भाव मिळाले. सुरूवातीला २७00 रूपयांपासून तर तीन हजार रूपये क्विंटलने विक्री झालेले सोयाबीन सर्वाधिक होते. त्यानंतर बाजारात तेजी आली मात्र याचा फायदा साठवणुकदारच घेऊ शकले. यामध्ये शेतकर्‍यांकडे साठवण क्षमता नसल्याने व आर्थिक अडचण असल्याने सोयाबीनमध्ये आर्थिक बजेट लागला नाही. कपाशीमध्ये कोरडवाहू शेतकरीही बरे प्रमाणात उत्पादन घेऊ शकले. कारण नंतरचा पाऊस हा कपाशीसाठी पोषक ठरल्याने फर्दळने अनेकांचा आर्थिक फायदा करून दिला व फर्दळ चार हजार रूपयांचेवर भाव देऊन गेल्याने सोयाबीन पेरणी करणारा पश्‍चाताप करताना दिसत होता. म्हणूनच यंदाच्या हंगामात निव्वळ सोयाबीनच्या नांदात अडकल्यापेक्षा कपाशी पेरलेली बरी, हाच विचार प्रत्येकाच्या मनात येत असल्याचे दिसत आहे. परंतु कृषी विभागाने गत वर्षीच्या हंगामानुसार काढलेला अंदाज सोयाबीन पिकावर भर देणारा ठरत आहे. त्यामध्ये ४४ हजार ७00 हेक्टरपैकी कपाशी १३ हजार ३६२ हेक्टर, सोयाबीन १७ हजार ५४१ हेक्टर, ज्वारी ३ हजार हेक्टर, मका १८00 हेक्टर, तूर ३ हजार ६00 हेक्टर, मुंग ३ हजार ३00 हेक्टर, उडीद २ हजार हेक्टर तर बाजरी पूर्णत: बाद दाखविण्यात आली आहे. या अंदाजाला सोयाबीनच्या बियाण्याची वाढीव किंमत मोठा अडथळा ठरू शकते. कारण ३0 किलो सोयाबीन ज्यांनी ९00 रूपयात विकले तेच ३0 किलो २७00 रूपयात मिळत असल्याने ऐनवेळी निर्णय बदल होण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या एका बॅगमध्ये जेवढे क्षेत्र पेरणी होते त्यापेक्षा जास्त क्षेत्र कपाशीचे होते. तेवढय़ाच पैशात व खतासह असा आर्थिक बजेट लक्षात घेता कपाशी पिकाचा पेरा वाढण्याचा अंदाज जाणकारांचा आहे. सोबतच यंदाची नैसर्गिक स्थिती लक्षात घेता कपाशी पिकाकडे वळणार्‍यांची संख्या वाढणार आहे.