शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

लग्नांमधील खर्चिक पद्धत बाद

By admin | Updated: July 12, 2014 00:14 IST

बावनी पंचायत संस्थेचा पुढाकार : वाल्मीक समाजाला ‘रजत’ नगरीतून नवी दिशा.

अनिल गवई/खामगाववाल्मीक समाजाच्या विवाह सोहळय़ांमध्ये होणारा अवास्तव खर्च, चुकीच्या चालीरिती आणि परंपरांना तिलांजली देण्याची सुरूवात बुलडाणा जिल्ह्या तील रजतनगरी खामगावमधून झाली आहे. या समाजाच्या विवाह सोहळ्यांमध्ये पूर्वी वेगवेगळे मान असायचे. या मानांची संख्या कमी करून, येथील बावनी पंचायत बहुउद्देशीय संस्थेने सामूहिक सोहळय़ांवर भर दिला आणि वाल्मीक समाजाला नवी दिशा दिली. वाल्मीक समाजाच्या विवाह सोहळय़ांमध्ये पूर्वी पाच वेगवेगळे मान दिले जात होते. आगमन, नास्ता, जेवण, लग्न आणि बिदाई हे ते पाच मान होते. आगमनाचा मान एक रुपयांपासून जास्तीत जास्त पाच हजार एक रुपये ठरविण्यात आला. पूर्वी विवाह सोहळ्यात भेटवस्तू देणे बंधनकारक होते. ते आता ऐच्छिक करण्यात आले. याशिवाय मामा-मामी, जावाई यांचे मानही कमी करण्यात आले. आता आगमन, लग्न, आणि बिदाई हे तीनच मान ठेवण्यात आले. अवास्तव खर्च टाळण्यासाठी लग्नात साधे जेवण देण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही समाजाने घेतला आहे.सन २00४ पासून महाराष्ट्र वाल्मीक मेहतर बावनी पंचायत बहुउद्देशीय संस्थेने समाजाला एकजूट करण्याची मोहीम संपूर्ण राज्यात राबविली. त्यासाठी प्रत्येक वर्षी अधिवेशन घेऊन, संस्थेचे संस्थापक प्रतापराव निंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी मे महिन्यात समाजाचे अधिवेशन खामगाव येथे घेण्यात आले. या अधिवेशनात विवाह सोहळय़ांमधील खर्चिक परंपरांना तिलांजली देण्याचा ठराव घेण्यात आला. आता खामगावात झालेल्या ठरावानुसारच देशभरात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. त्यामुळे विवाहाच्या खर्चात बचत होत आहे. लग्नासाठी कर्ज घेण्याची वेळ कुणावरही येणार नाही, याची विशेष खबरदारी बावनी पंचायतने घेतली आहे.वाल्मीकी मेहतर समाज बावनी पंचायतीचे अध्यक्ष प्रतापराव निंदाने यांनी मेहतर समाजाचे राष्ट्रीय पातळीवरील पहिले अधिवेशन २0१२ साली पार पडले तर लग्न सोहळ्यातील अवास्तव खर्चाला फाटा देत राष्ट्रीय पातळीवरील पहिला सामूहिक विवाह सोहळा खामगावात २0१४ साली पार पडला असल्याचे सांगीतले. *राज्यात दहा हजाराच्यावर विवाह२00६ पासून बावनी पंचायतने खर्चिक विवाह पद्धतीला फाटा दिला. तेव्हापासून राज्यात दहा हजाराच्यावर विवाह सोहळे पार पडले. या सोहळय़ांमध्ये अवास्तव खर्च टाळण्यात आले. हा खर्च आणखी कमी करण्यासाठी बावनी पंचायतने यावर्षीपासून राष्ट्रीय सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा पायंडा पाडला आहे.