शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लग्नांमधील खर्चिक पद्धत बाद

By admin | Updated: July 12, 2014 00:14 IST

बावनी पंचायत संस्थेचा पुढाकार : वाल्मीक समाजाला ‘रजत’ नगरीतून नवी दिशा.

अनिल गवई/खामगाववाल्मीक समाजाच्या विवाह सोहळय़ांमध्ये होणारा अवास्तव खर्च, चुकीच्या चालीरिती आणि परंपरांना तिलांजली देण्याची सुरूवात बुलडाणा जिल्ह्या तील रजतनगरी खामगावमधून झाली आहे. या समाजाच्या विवाह सोहळ्यांमध्ये पूर्वी वेगवेगळे मान असायचे. या मानांची संख्या कमी करून, येथील बावनी पंचायत बहुउद्देशीय संस्थेने सामूहिक सोहळय़ांवर भर दिला आणि वाल्मीक समाजाला नवी दिशा दिली. वाल्मीक समाजाच्या विवाह सोहळय़ांमध्ये पूर्वी पाच वेगवेगळे मान दिले जात होते. आगमन, नास्ता, जेवण, लग्न आणि बिदाई हे ते पाच मान होते. आगमनाचा मान एक रुपयांपासून जास्तीत जास्त पाच हजार एक रुपये ठरविण्यात आला. पूर्वी विवाह सोहळ्यात भेटवस्तू देणे बंधनकारक होते. ते आता ऐच्छिक करण्यात आले. याशिवाय मामा-मामी, जावाई यांचे मानही कमी करण्यात आले. आता आगमन, लग्न, आणि बिदाई हे तीनच मान ठेवण्यात आले. अवास्तव खर्च टाळण्यासाठी लग्नात साधे जेवण देण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही समाजाने घेतला आहे.सन २00४ पासून महाराष्ट्र वाल्मीक मेहतर बावनी पंचायत बहुउद्देशीय संस्थेने समाजाला एकजूट करण्याची मोहीम संपूर्ण राज्यात राबविली. त्यासाठी प्रत्येक वर्षी अधिवेशन घेऊन, संस्थेचे संस्थापक प्रतापराव निंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी मे महिन्यात समाजाचे अधिवेशन खामगाव येथे घेण्यात आले. या अधिवेशनात विवाह सोहळय़ांमधील खर्चिक परंपरांना तिलांजली देण्याचा ठराव घेण्यात आला. आता खामगावात झालेल्या ठरावानुसारच देशभरात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. त्यामुळे विवाहाच्या खर्चात बचत होत आहे. लग्नासाठी कर्ज घेण्याची वेळ कुणावरही येणार नाही, याची विशेष खबरदारी बावनी पंचायतने घेतली आहे.वाल्मीकी मेहतर समाज बावनी पंचायतीचे अध्यक्ष प्रतापराव निंदाने यांनी मेहतर समाजाचे राष्ट्रीय पातळीवरील पहिले अधिवेशन २0१२ साली पार पडले तर लग्न सोहळ्यातील अवास्तव खर्चाला फाटा देत राष्ट्रीय पातळीवरील पहिला सामूहिक विवाह सोहळा खामगावात २0१४ साली पार पडला असल्याचे सांगीतले. *राज्यात दहा हजाराच्यावर विवाह२00६ पासून बावनी पंचायतने खर्चिक विवाह पद्धतीला फाटा दिला. तेव्हापासून राज्यात दहा हजाराच्यावर विवाह सोहळे पार पडले. या सोहळय़ांमध्ये अवास्तव खर्च टाळण्यात आले. हा खर्च आणखी कमी करण्यासाठी बावनी पंचायतने यावर्षीपासून राष्ट्रीय सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा पायंडा पाडला आहे.