शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अतिक्रमण काढण्याचे पालिकेला आदेश नाहीत

By admin | Updated: April 30, 2015 01:43 IST

बुलडाणा येथील व्यावसायिकांचे नुकसान.

बुलडाणा : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आल्याचे नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे; परंतु उच्च न्यायालयाने असे कोणतेच आदेश दिले नसून फक्त मलकापूर-बुलडाणा-चिखली या महामार्गावरील रहदारीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोणाच्या आदेशावरून शहरातील अतिक्रमण हटवून शेकडो व्यावसायिकांचे नुकसान करून रोजगारापासून वंचित ठेवले, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. गेल्या काही वषार्ंपासून शहरातील शासकीय जागेवर शेकडो बेरोजगारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. आज जवळपास शहरात दोन हजार अतिक्रमिक आहेत. काही दिवसांपूर्वीच शहरातील अतिक्रमण संदर्भात नव्हे तर मलकापूर ते चिखली या राज्य महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविण्यात यावे, याबाबतची ५१/१४ या क्रमांकाची याचिका अँड. प्रवीण वाघमारे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाने याच याचिकेचा फायदा घेऊन शहराच्या विविध भागातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नगरपालिका प्रशासनाने शेकडो व्यावसायिकांचे अतिक्रमण काढून त्यांना बेरोजगार केले आहे; परंतु सदर अतिक्रमण हटाव मोहीम ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार काढण्यात येत असल्याचे नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे; परंतु शहरातील अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाचे आदेश नसून फक्त मलकापूर ते चिखली या महामार्गावरील अतिक्रमण काढण्याचे व दिवाबत्तीची सोय करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून नगरपालिका प्रशासनाने कोणाच्या आदेशावरून सदर अतिक्रमण मोहीम राबविली, असा प्रश्न उपस्थित होते.