शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

कोरोनाचा ‘मानव विकास’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

बुलडाणा : कोरोना संक्रमणामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील विकास ...

बुलडाणा : कोरोना संक्रमणामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला असून, मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील विकास प्रक्रियेंतर्गत येत असलेल्या कामांनाही याचा फटका बसला आहे. प्रामुख्याने या सात तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी अर्थात या तालुक्यातील आर्थिक, आरोग्य आणि शिक्षणस्तर वाढविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत होत्या. प्रामुख्याने त्यांना यामुळे फटका बसला. थोडक्यात, एकप्रकारे मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या प्रयत्नांनाच त्यामुळे खीळ बसली आहे. २०१३ पासून राज्यात मानव विकास निर्देशांकामध्ये मागे असलेल्या १२५ तालुक्यांत प्रामुख्याने मानव विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये या संबंधित तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिकांचा आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक स्तर वाढविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली विविध योजनांचे एकत्रीकरण करून या तालुक्यातील जीवनमान उंचावण्यास प्राधान्य देण्यात येत होते. मात्र, कोरोनामुळे यासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या योजनांनाच खीळ बसली. आता कोरोनाचे संक्रमण कमी व नियंत्रणात आल्यामुळे या योजनांना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या सातही तालुक्यांतील नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांनाही फटका बसला आहे. परिणामी कोरोनामुळे या उपक्रमांना नेमका काय फटका बसला याचेही मोजमाप होण्याची गरज आहे.

--मानव विकासच्या बसेस बंद--

कोरोनामुळे मधल्या काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे मानव विकासच्या वतीने मुला-मुलींना शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात सुरू केलेल्या ४९ बसेसही बंद कराव्या लागल्या होत्या. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यामुळे आता जिल्ह्यातील ४८७ शाळा सुरू झालेल्या आहेत. परिणामी या शाळांच्या मार्गावर ‘मानव विकास’च्या बसेस सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

--अभ्यासिका, बालभवनही बंद--

विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी तथा त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी ‘मानव विकास’ अंतर्गत सातही तालुक्यांत जवळपास १६४ अभ्यासिका यापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. शाळा बंद असल्यामुळे त्यांचाही विद्यार्थ्यांना लाभ घेता आला नाही. सोबतच सातही तालुक्यांतील ग्रामीण भागातील सात शाळांमध्ये सात बालभवन उभारण्यात आलेले आहेत. जवळपास ७० लाख रुपयांचे साहित्य त्यासाठी २०१५ दरम्यान खरेदी करण्यात आलेले होते. दरवर्षी साधारणत: २० हजार विद्यार्थी त्यांचा लाभ घेतात. मात्र, त्यालाही कोरोनामुळे फटका बसला आहे.