शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

कोरोना अद्याप गेला नाही, या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

--पालिकेची नऊ पथके कार्यरत-- १) कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाच्या प्रतिबंधासाठीचे नियम पाळल्या जातात की नाही, यासाठी आधीपासूनच गठित ...

--पालिकेची नऊ पथके कार्यरत--

१) कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाच्या प्रतिबंधासाठीचे नियम पाळल्या जातात की नाही, यासाठी आधीपासूनच गठित गेलेल्या पालिकेच्या नऊ पथकाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

२) प्रत्येक पथकामध्ये पालिका आणि पोलीस दलातील कर्मचारी आहेत. त्यामुळे कोरोना संपला अशा आविर्भावात असलेल्यांना प्रसंगी फटका बसू शकतो.

३) गठित करण्यात आलेल्या या नऊ ही पथकांना शहरात विविध भागांत तैनात करण्यात आलेले आहे.

४) त्यामुळे प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्वांनी आवर्जून पालन करणे गरजेचे आहे.

--त्रिसूत्रीचे पालन आवश्यक--

कोरोना प्रतिबंधासाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी नागरिकांनी ती सवयच लावून गेणे आवश्यक आहे. कोरोनाला कडक निर्बंधामुळे पायबंद घालण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी तो पुन्हा डोके वर काढू शकतो. पहिली पेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेबाबत दक्षता हेच प्रमुख अस्त्र आहे. त्याचे काटेकोर पालन केल्यास तिसऱ्या लाटेतील संभाव्य मोठे नुकसान आपण टाळू शकतो, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांनी सांगितले.

अ) निर्बंध शिथिल झाल्यानंतर बेफिकीर झालेल्यांनी बाजारात मोठी गर्दी केली. यातून अनेकांनी कोरोना घरी नेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब) कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन होत नाही. अनेकांचा मास्क हा हनुवटीवर असतो. गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना आहेत. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही.

क) कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग सुरूच ठेवून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे आवश्यक. गृहविलगीकरणातील अनेकांना बाहेर फिरून कोरोनाचे संक्रमण वाढवले.

ड) जानेवारीत जिल्ह्यात झालेल्या ५२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही हातभार ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्यास झाला. प्रचार सभा, बैठका व गर्दीमुळे संक्रमणास हातभार लागल्याचे दिसून आले.

इ) पहिल्या लाटेत कौटुंबिकस्तरावर काळजी घेण्यात आली. लक्षणे दिसल्यानंतर चाचण्याही केल्या. दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ गृहविलगीकरणावर भर दिल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले. त्यातून मृत्युदर वाढला.

--अनलॉक--

पहिला

५ जून २०२०

एकूण कोरोना रुग्ण : ८२

मृत्यू : ३

आताचा

१ जून २०२१

एकूण कोरोना रुग्ण : ८४,९०६

मृत्यू : ६०९