शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धरणांना पडली कोरड!

By admin | Updated: July 30, 2015 23:25 IST

दोन महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील पाऊस गायब; जलसाठय़ात झपाट्याने घट.

बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी आतापर्यंत सरासरी एक आठवडा पाऊस झाला. त्यानंतर २0 जूनपासून पाऊस बेपत्ता झाला, तर गत २६ व २७ जुलै या दिवशी काही तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम व ७४ लघ प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, जिल्ह्यातील धरणे अद्यापही तहानलेली आहेत.जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. त्यानंतर कमी-जास्त प्रमाणात एक आठवडा पाऊस पडला व २0 जूननंतर आतापर्यंत पावसाने खंड दिला आहे. १३ जूननंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पाच्या पातळीत नगण्य वाढ झाली व ही वाढ तेवढय़ाच झपाट्याने कमी होत आहे. २५ आणि २८ जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे धरणांची तहान भागली नाही. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी २३.१६ टक्के जलसाठा होता. आता ३५.९९ टक्के आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांत महिन्यापूर्वी २0.५२ टक्के जलसाठा होता. आता २९.४४ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७४ लघुप्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी ७.९१ टक्के जलसाठा होता. आता १२.१३ टक्केच जलसाठा वाढला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठय़ाची जी स्थिती होती, त्यात नगण्य वाढ झाली आहे; परंतु पावसाचा खंड वाढल्यास या प्रकल्पांतील पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १८.२४ जलसाठा आहे. ही २४.४३ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत १४.0६ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी २३.६0 आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ५0.0३ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ४३.६४ आहे. सदर जलसाठा पावसाने दडी मारल्याने तसेच पाण्याचा वापर वाढल्यामुळे कमी-कमी होत आहे. * जलसाठय़ाचा सिंचनासाठी वापरपावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र या दोन महिन्यात पावसाची सरसरी १५८.५ मिमीच्या वर वाढली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलपातळीत नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ७४ लघु प्रकल्प अशा एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८ टक्के जलसाठा होता; मात्र बर्‍याच ठिकाणी या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी सुरू असल्यामुळे जलसाठा झपाट्याने खालावत आहे.