शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

धरणांना पडली कोरड!

By admin | Updated: July 30, 2015 23:25 IST

दोन महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील पाऊस गायब; जलसाठय़ात झपाट्याने घट.

बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी आतापर्यंत सरासरी एक आठवडा पाऊस झाला. त्यानंतर २0 जूनपासून पाऊस बेपत्ता झाला, तर गत २६ व २७ जुलै या दिवशी काही तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम व ७४ लघ प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, जिल्ह्यातील धरणे अद्यापही तहानलेली आहेत.जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. त्यानंतर कमी-जास्त प्रमाणात एक आठवडा पाऊस पडला व २0 जूननंतर आतापर्यंत पावसाने खंड दिला आहे. १३ जूननंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पाच्या पातळीत नगण्य वाढ झाली व ही वाढ तेवढय़ाच झपाट्याने कमी होत आहे. २५ आणि २८ जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे धरणांची तहान भागली नाही. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी २३.१६ टक्के जलसाठा होता. आता ३५.९९ टक्के आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांत महिन्यापूर्वी २0.५२ टक्के जलसाठा होता. आता २९.४४ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७४ लघुप्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी ७.९१ टक्के जलसाठा होता. आता १२.१३ टक्केच जलसाठा वाढला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठय़ाची जी स्थिती होती, त्यात नगण्य वाढ झाली आहे; परंतु पावसाचा खंड वाढल्यास या प्रकल्पांतील पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १८.२४ जलसाठा आहे. ही २४.४३ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत १४.0६ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी २३.६0 आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ५0.0३ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ४३.६४ आहे. सदर जलसाठा पावसाने दडी मारल्याने तसेच पाण्याचा वापर वाढल्यामुळे कमी-कमी होत आहे. * जलसाठय़ाचा सिंचनासाठी वापरपावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र या दोन महिन्यात पावसाची सरसरी १५८.५ मिमीच्या वर वाढली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलपातळीत नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ७४ लघु प्रकल्प अशा एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८ टक्के जलसाठा होता; मात्र बर्‍याच ठिकाणी या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी सुरू असल्यामुळे जलसाठा झपाट्याने खालावत आहे.