शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

उपाहारगृहांमध्ये दूषित पाणी; आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 3, 2017 01:08 IST

खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. जलजन्य आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जलशुद्धी उपकरण लावणे आवश्यक असताना अनेक उपाहारगृहामध्ये ते बंदावस्थेत असल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करणे गरजेचे आहे. शहरातील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही, या पाण्याचा व्यावसायिक वापर करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल, त्यावेळी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्यपदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिले जाते. अनेकदा या पाण्यात जंतू आढळून येतात. या हॉटेलमध्ये बनणारे पदार्थ हे चमचमित आणि तेलकट असतात. यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते. तसेच प्रत्येकाचीच असे पदार्थ खाल्ल्यावर पाणी विकत घेऊन पिण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे. काही उपाहारगृहात विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु सदर विहिरीचे पाणी निजर्तंुकीकरणाअभावी अशुद्ध असते. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगूनही ते पाणी पिण्यास वापरले जाते. तपासणी मोहीम सुरू करण्याची गरजतालुक्यातील उपाहारगृहात हीच परिस्थिती आहे. उच्च प्रतिच्या हॉटेलमध्ये शुद्ध पाण्याची बाटली विकली जाते. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हॉटेलमध्ये शुद्ध पाणी असतेच असे नाही. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी विकत घेऊन पाणी प्यावे, यासाठी म्हणून असे पाणी वापरले जात असल्याचेही वास्तव आहे. जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आरोग्याला धोका असतो. यातूनच जलजन्य, साथीच्या आजाराला सुरुवात होऊन, काही जीव गमावण्याची वेळ आली आहे. यासाठी ग्रामपंचायती, नगर परिषद प्रशासनाने पिण्याचे पाणी तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.