शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

उपाहारगृहांमध्ये दूषित पाणी; आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 3, 2017 01:08 IST

खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रास अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. जलजन्य आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जलशुद्धी उपकरण लावणे आवश्यक असताना अनेक उपाहारगृहामध्ये ते बंदावस्थेत असल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तपासणी करणे गरजेचे आहे. शहरातील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले असतानाही, या पाण्याचा व्यावसायिक वापर करतात. हेच पाणी हॉटेल व्यावसायिकही वापरतात. शहरात एखाद्या ठिकाणी पाण्याची बोंब असेल, त्यावेळी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. हॉटेलमधील चवीचे खाद्यपदार्थ, चहा आदी बनविण्याकरिता याच पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. शिवाय नागरिकांना हेच पाणी पिण्यास दिले जाते. अनेकदा या पाण्यात जंतू आढळून येतात. या हॉटेलमध्ये बनणारे पदार्थ हे चमचमित आणि तेलकट असतात. यामुळे ते खाल्ल्यावर प्रत्येकालाच भरपूर पाणी प्यावे लागते. तसेच प्रत्येकाचीच असे पदार्थ खाल्ल्यावर पाणी विकत घेऊन पिण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा नागरिकांचे आरोग्य अधिकच धोक्यात येत आहे. काही उपाहारगृहात विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु सदर विहिरीचे पाणी निजर्तंुकीकरणाअभावी अशुद्ध असते. पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगूनही ते पाणी पिण्यास वापरले जाते. तपासणी मोहीम सुरू करण्याची गरजतालुक्यातील उपाहारगृहात हीच परिस्थिती आहे. उच्च प्रतिच्या हॉटेलमध्ये शुद्ध पाण्याची बाटली विकली जाते. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हॉटेलमध्ये शुद्ध पाणी असतेच असे नाही. किंबहुना बरेचदा ग्राहकांनी विकत घेऊन पाणी प्यावे, यासाठी म्हणून असे पाणी वापरले जात असल्याचेही वास्तव आहे. जुन्या गोल टाक्यांमध्ये, रांजणात पाणी साठवले जाते. यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आरोग्याला धोका असतो. यातूनच जलजन्य, साथीच्या आजाराला सुरुवात होऊन, काही जीव गमावण्याची वेळ आली आहे. यासाठी ग्रामपंचायती, नगर परिषद प्रशासनाने पिण्याचे पाणी तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.