शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा तक्रारींवर विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST

मेहकर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे बँक व आपले सरकार सेवा केंद्र संचालकांच्या विविध अडचणी आहेत. या ...

मेहकर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे बँक व आपले सरकार सेवा केंद्र संचालकांच्या विविध अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्याकरिता तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे गठन करून बुधवारी या समितीची बैठक तहसीलदारांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पीक विमा तक्रारींवर विचारविनिमय करण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण व्हावे, याकरिता शासनाकडून ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबवली जाते. याकरिता शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होऊन शासनाने दिलेला शेतकरी हिस्सा विविध पिकांच्या बदल्यात भरावयाचा असतो. शेतकरी, बँक व आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागतो. याशिवाय शेतकऱ्यांना पीक विमा भरल्यानंतर पुढील बाबींसाठी त्यांना वारंवार कृषी विभागाच्या चकरा माराव्या लागतात. त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, याकरिता मेहकर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे गठन करून या समितीची बुधवारी तहसील कार्यालयात सभा घेण्यात आली. या तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार डाॅ. संजय गरकल तर सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे आहेत. सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, मंडल कृषी अधिकारी जानेफळ, डोणगाव, मेहकर, शेतकरी प्रतिनिधी शालिकराम तुळशीराम वाघ, संतोष जगदेवराव आखाडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, पीक विमा कंपनीची जिल्हा विमा प्रतिनिधी, तालुका विमा प्रतिनिधी गाडे, आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक ओमप्रकाश देवकर, सय्यद अजीम सय्यद रशिद यांचा समावेश आहे. या तक्रार निवारण समितीला तहसीलदार डॉ. संजय गरकल, तालुका कृषी अधिकारी विजय सरोदे, कृषी पर्यवेक्षक विजय राजूरकर यांनी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांचा पीक विमा भरताना आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांनी अर्ज व्यवस्थित भरून त्याची रजिस्टरला नोंद घेऊन शेतकऱ्यांना विनातक्रार पावती द्यावी. यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय होता कामा नये.

- डॉ. संजय गरकल, तहसीलदार, मेहकर

जाचक अटी रद्द करण्याची मागणी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयामध्ये अनेक बाबतीत बदल होणे गरजेचे आहे. जेणेकरून बँका, आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक, कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी यांना पीक विमा भरणे सोयीचे होईल. पीक विमा भरताना कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी काही जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्या अटींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणीही या सभेत करण्यात आली.