शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

समृद्धी महामार्गाविरोधात काँग्रेस छेडणार आंदोलन

By admin | Updated: September 6, 2016 02:12 IST

शेतक-यांच्या विरोधाची दखल; मेहकर येथील बैठकीतून दिशा ठरविणार.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ५ : मलेशियानंतर आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाच्या नागपूर - मुंबई 'सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे' मुळे मार्गावरील शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार असून, काही गावेही यात विस्थापित होणार आहेत. त्यामुळे हा मार्ग शेतकर्‍यांसाठी विनाशाचा मार्ग ठरणार असल्याने या सर्व शेतकर्‍यांचा आक्रोश समजून घेऊन त्यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी मेहकर येथे महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने बैठक आयोजित केली असून, या शेतकरी लढय़ाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार भाई वीरेंद्र जगताप, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, बुलडाणा आमदार हर्षवर्धन सपकाळ, रिसोड आमदार अमित झनक, यांची या बैठकीस विशेष उपस्थिती राहणार आहे. मेहकर येथील डोणगाव रोडस्थित गजानन महाराज मंदिर सभागृहात ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूर ते मुंबई या द्रूतगती महामार्गामुळे अमरावती, वाशिम, बुलडाणा या जिल्हय़ातील विशेषत: वाशिम, बुलडाणा या जिल्हय़ातील शेती मोठय़ा प्रमाणात अधिग्रहीत केल्या जाणार आहे. त्यात अनेक गावे विस्थापित होणार आहेत. विस्थापित होणार्‍यांची मनोभूमिका जाणून घेऊन व या शेतकर्‍यांची संपूर्ण ताकद पणाला लावून हा शेतकरी जीवनातून उठविण्याचा डाव सर्व मिळवून उधळून लावण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली असून, याबाबत व्या पक चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून, या बैठकीस शेतकर्‍यांनी मोठय़ा सं ख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, बुलडाणाद्वारे करण्यात आले आहे.