शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेगावात काँग्रेसची सरशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:05 IST

शेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच

फहीम देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:    तालुक्यातील १0 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या  निवडणुकीची मत मोजणी स्थानिक पंचायत समितीच्या  सभागृहात पार पडली. या निकालात तालुक्यात भारतीय राष्ट्रीय  काँग्रेस पक्षाने बाजी मारल्याचे दिसून आले. दरम्यान, शेगाव  तालुक्यात काँग्रेस आणि भाजपने समान दावे ठोकल्याने  राजकीय पेच निर्माण झाले आहे. सरपंच पदाच्या १0 पैकी ६   काँग्रेस, २ भाजपा  तर २ ठिकाणी अपक्ष निवडून आले आहे.   गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण भागातील पहिल्या ट प्प्यातील उत्सुकता संपली आहे. सर्व ग्रामपंचायतींमधील सत्तेचे  चित्र स्पष्ट झाले असून, या निकालात अनेक ग्रामपंचायतीत ध क्कादायक निकाल लागल्याचे पाहायला मिळाले.या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वैशिष्ट्य असे की, या  निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच निवड होत  आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ७ ऑ क्टोबरला मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल आज  सोमवारी लागला. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षाच्या  नावावर नसल्या तरी कार्यकर्त्यांवर मात्र पक्षांचे हक शिक्के  असल्याचे जाणवले. निकाल लागताच तो या पक्षाचा तो त्या  पक्षाचा ही भाषा ऐकावयास मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  पक्षाला मोठे यश मिळाले. येऊलखेड, कठोरा, चिंचखेड,  सगोडा, आणि माटरगाव खु. या पाच ग्रामपंचायतीवर त्यांनी दावा  केला आहे. तर भारिपने पाळोदी ग्रामपंचायतीवर दावा केला हो ता; मात्र हा दावा सरपंचांनी खोडून काढल्याची माहिती आहे.  भाजपाने खातखेड आणि कुरखेड या ग्रामपंचायतीवर दावा  केला तर निवडून आल्यानंतर कठोरा आणि येऊलखेड येथी  सरपंच भाजपाच्या आश्रयात पोहचले असल्याचे सांगण्यात  आले; मात्र लगेच दुसरीकडून या सरपंचांनी हा दावा खोडून  काढला आहे. भारिपचे स्थिती ही तशीच झाली पाळोदी ग्रा. प.  वर भारिपचा झेंडा कायम झाल्याचे वृत्त देण्यात आले; मात्र सर पंचांनी आपण स्वतंत्र असल्याचे सांगितले. भारिपचे जिल्हाध्यक्ष  राजाभाऊ भोजने यांच्या कन्येला तिव्हाण येथे पराभवाला सामोरे  जावे लागले. शेवटी भारिपचे पारड्यात एकही सरपंच आला  नाही.

सत्कार स्वीकारून दिला नारळ!शेगाव: सरपंच निवडून आल्यानंतर प्रत्येक पक्ष त्या विजयी  उम्मेदवाराला आपला माणूस म्हणून संबोधण्यास पुढे येत आहे.  यात भाजपाने तालुक्यातील ४ सरपंचाचे सत्कार स्थानिक विश्रम  भवन आणि खामगावात केले; मात्र सत्कार संपताच यातील  दोघांनी पक्षाबाबत हात वर केल्याचे समजते. तालुक्यातून १0  पैकी १ ठिकाणी भाजपा स्पष्ट विजय मिळाला. तर लासुरा,  येऊलखेड, आणि कुरखेड येथे निवडून आलेले सरपंच यांनी  भाजपात प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्याचे सांगितले; मात्र बाहेर  पडताच यातील दोघांनी आपल्याला आमदार साहेबांनी स त्कारासाठी बोलावले होते. सत्कार हा विषय वेगळा आहे; मात्र  आपला भाजपाशी संबंध नसल्याचे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे स्पष्ट  केले. यामुळे नवनिर्वाचित सपरांचांनी सत्कार स्वीकारून नारळ  दिल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.