शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत

By admin | Updated: September 1, 2014 22:48 IST

मागील वीस वर्षांपासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांना लीड देणारे नांदुरा शहर भाजपाचा गड बनले आहे.

नांदुरा: मागील वीस वर्षांपासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांना लीड देणारे नांदुरा शहर भाजपाचा गड बनले आहे. शहरात काँग्रेस आहे; मात्र नगरपालिकेत सत्ता नसल्याने त्यांची शक्ती गटागटात विभागली आहे. त्यामुळे शहरात भाजपाची घोडदौड थांबविण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला या विधानसभा निवडणुकीत जास्त जनसंपर्क व पक्षीय रचनात्मक फेरबदल करणे गरजेचे आहे.शहरात भाराकाँचा एकवीसपैकी एकच नगरसेवक आहे. त्यावरून पक्षाच्या ताकदीचा अंदाज येतो; मात्र शहरात काँग्रेस विचारसरणीचे कार्यकर्ते व नागरिक आहेत.भाजपात माजी नगराध्यक्ष राजेश एकडे आल्याने भाजपा मजबूत झाली; मात्र पूर्वीच्या नगरसेवक व पदाधिकारी यांच्या भूमिकेमुळे भाजपातही गटाचे राजकारण शिरले आहे. मात्र नगराध्यक्ष भाजपाचा आहे.शिवसेनेचे शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे यांचा शहरात व्यापक जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा भाजपाला होईल; मात्र त्यांच्या पक्षाचे दोन नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.शहरावर मजबूत पकड असलेल्या आ. चैनसुख संचेती यांना भाजपा एकसंघ ठेवण्याचे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला जुन्या व नवीन कार्यकर्त्यांचा मेळ करून नवीन ताकद उभारण्याचे आवाहन आहे.विश्‍वप्रसिद्ध हनुमान मूर्तीमुळे अध्यात्मिक ओळख असलेले नांदुरा शहर खव्याच्या व्यापारामुळे व व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे नावारूपास आले आहे. मागील २0 वर्षात न.प. वर नगरविकास आघाडी स्थापन करून राजेश एकडे व नंतर भाजप यांचीच सत्ता आहे. खंदे कार्यकर्ते असतानाही काँग्रेसला सत्ता प्राप्त झाली नाही. मागील न.प. निवडणुकीत शहर अध्यक्ष रतन भोंगे यांनी मेहनत घेतली; मात्र नवीन राजकीय समीकरणांमुळे त्यांना यशोशिखर गाठता आले नाही. मागील २0 वर्षात आ. संचेती यांनी नांदुरा शहरावर मजबूत पकड ठेवली. मागील चारपैकी एका निवडणुकीत त्यांना लीड मिळाला नव्हता त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ४00 मतांनीचे ते मागे होते. त्यावेळी न.प.त सत्ता राजेश एकडे यांच्या नगरविकास आघाडीची होती; मात्र इतर तीन वेळा आ. संचेती यांना निर्णायक लीड या शहराने दिला आहे. आज रोजी राजेश एकडे यांच्या खांद्यावर शहर भाजपाची धुरा आहे; मात्र न.प. नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपातील मनोभेद समोर आल्याने भाजपाला एकसंघ ठेवण्याचे आवाहन आ. संचेती यांना आहे. शहरात नवीन पाणीपुरवठा योजना, ग्रामीण रुग्णालय, अग्निसुरक्षा यंत्रणा, नांदुरा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, रेल्वे उड्डाणपुलासाठी निधीची तरतूद आदींसह शहरातील अंतर्गत रस्ते यांच्याकरिता त्यांच्या व खासदार अजय संचेती यांच्या निधीतून विकासकामे तडीस नेल्याने त्यांची जमेची बाजू आहे. एकसंघ भाजप व सोबत शिवसेना यांची अभेद्य युती काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी तगडे आवाहन आहे.भाजपा-सेना युतीप्रमाणे शहरात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे मोठे नेटवर्क आहे. मोदी लाटेत शहरात भाजपाला लीड मिळाला; मात्र त्या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळालेली मते आजही शहरात ते तगडे आव्हान देऊ शकतात याचा प्रत्यंतर करून देतात. काँग्रेस शहर अध्यक्ष रतन भोंगे त्यांच्या नवीन जोमाच्या कार्यकर्त्यांच्या फळीसोबत जुनेजाणते अनुभवी पदाधिकारी व राष्ट्रवादी एकसंघ होऊन कामाला लागल्यास भाजपाचा गड संबोधल्या जाणार्‍या नांदुरा शहरातही चमत्कार होऊ शकतो; मात्र त्याकरिता काँग्रेसला सर्वशक्तीनिशी एकसंघ होऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचावे लागेल व हाडाच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागेल.यावेळी काँग्रेसकडून नांदुरा तालुक्यात उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे हे उमेदवारी साठी स्पध्रेत असून, शिवचंद्र तायडे व डॉ. अरविंद कोलते हेसुद्धा शर्यतीत आहेत. तायडे व कोलते यांनी यापूर्वी संचेती यांच्याशी लढत देऊन पराभव पत्करला असल्याने आता नवा प्रयोग म्हणून नांदुर्‍याला प्रतिनिधित्व देण्याची मागणी रेटून धरली आहे.आज रोजी आ. संचेती यांचा मागील २0 वर्षांचा व्यापक जनसंपर्क, ताब्यात असलेली नगरपालिका व राजेश एकडेसारखा अनुभवी शहर अध्यक्ष आणि सोबत युतीत शिवसेना शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे या आमदार संचेती यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र नांदुरा शहरात सत्ता नसली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा कार्यकर्ता वर्ग व पदाधिकार्‍यांचे जाळे आहे. त्यांच्यामध्ये उमेदवाराने आत्मविश्‍वास निर्माण केला व सोबत भाजपा-शिवसेना विरुद्ध सर्व आघाड्यांवर लढा दिला, तर भाजपाच्या या मजबूत गडाला तडे देण्यची क्षमता व ताकद भाराकाँ -राष्ट्रवादी आघाडीत आहे. शहरात भारिप-बमसं व इतर काही पक्ष हे र्मयादित ताकदीत आहेत; मात्र सक्षम उमेदवार त्या पक्षांचा असल्यास ते मुख्य पक्षांची निर्णायक मते वळवू शकतात.