शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या हाती निलंबनाचे हत्यार

By admin | Updated: November 17, 2014 00:49 IST

सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे.

राजेश शेगोकार / बुलडाणाविधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने बुलडाण्यातील आपली संख्या कायम ठेवली असली तरी सत्ता गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षामध्येही मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे असतानाच पहिल्याच अधिवेशनात निलंबित झालेल्या पाच आमदारांमध्ये चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचा बळी गेला. विश्‍वासमत प्रस्तावाविरोधातील काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी हे निलंबन केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असला तरी आता याच निलंबनाचा हत्यार म्हणून वापर करीत काँग्रेस पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला पराभवानंतर लोकांमध्ये जायचे असेल, तर प्रभावी मुद्दा लागतो तो मुद्दा या निलंबनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या हाती लागल्याने येणार्‍या काळात बुलडाण्यातील काँग्रेसही राहुल मय होईल, हे स्पष्टच होत आहे.निलंबनाबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची आगामी भूमिका मांडली यावेळी निलंबित आमदार राहुल बोंद्रे व प्रत्यक्षदश्री आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. आपली बाजू मांडत असताना सरकारच्या भूमिकेचा परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील विरोधाभासी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले व या प्रकरणातील एकूणच भूमिका मांडताना सरकारने जाणीवपूर्वक हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे या प्रकरणातील राजकारण आता राज्यस्तरावर रंगणार असून, त्याचे पडसाद जिल्हास्तवरही पडतील. येणार्‍या हिवाळी अधिवेशनापर्यंत हा मुद्दा ताणून धरला जाईल. या निमित्ताने भाजपाने राष्ट्रवादीचा घेतलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, सेनेची सत्तेत सहभाग घेण्यासाठी होत असलेली ससेहोलपट या मुद्यांवर काँग्रेसला या दोन्ही पक्षांना सहज टार्गेट करता येणे शक्य आहे, या मुद्यावर भाजपा बचावात्मक पवित्र्यात आहे त्यामुळे भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेसला आधी एकसंघ होण्याची गरज आहे.    या पृष्ठभूमीवर राहुल बोंद्रे यांचे निलंबन हेच हत्यार म्हणून काँग्रेसने हातात घेतले असल्याने मरगळलेल्या पक्षामध्ये काही प्रमाणात चेतना येईल व विरोधकांवरही राजकीय वार करता येईल. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस याचा प्रभावी वापर कसा करते, यावरही काँग्रेसची दिशा अवलंबून आहे.*स्वाभिमानी पुन्हा सोयाबीन आंदोलनातभाजपाच्या सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चार गडी राखत मनातल्या मनात शरद पवारांचे नाव घेऊन विश्‍वासमत प्रस्ताव जिंकला. या चार गड्यांमध्ये मेटे, आठवले, जानकरांसोबतच शेट्टी यांचाही समावेश आहे. याच स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे खंदे सर्मथक पहिल्या फळीचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा मूळ भूमिकेत येत सोयाबीन व कापूस प्रश्नावर हात घालून आंदोलनाची हाक दिली. *मनसे नव्या विठोबाच्या शोधातमनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद सदस्य बुलडाण्याने विनोद वाघ यांच्या रूपाने दिला. वाघ यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसेला चर्चेत ठेवले; मात्र त्यांच्या आंदोलनात मुख्य टार्गेट हे राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे कायमच राहिले. वाघ यांच्या विरोधाने शिंगणे यांच्या मार्गात काहीही अडकाठी आली नाही. यावेळी मात्र निवडणुकीच्या मार्गावर शिंगणे नव्हतेच तरीही वाघ यांना पराभव पाहावा लागला.