शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेसच्या हाती निलंबनाचे हत्यार

By admin | Updated: November 17, 2014 00:49 IST

सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे.

राजेश शेगोकार / बुलडाणाविधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने बुलडाण्यातील आपली संख्या कायम ठेवली असली तरी सत्ता गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षामध्येही मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे असतानाच पहिल्याच अधिवेशनात निलंबित झालेल्या पाच आमदारांमध्ये चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचा बळी गेला. विश्‍वासमत प्रस्तावाविरोधातील काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी हे निलंबन केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असला तरी आता याच निलंबनाचा हत्यार म्हणून वापर करीत काँग्रेस पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला पराभवानंतर लोकांमध्ये जायचे असेल, तर प्रभावी मुद्दा लागतो तो मुद्दा या निलंबनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या हाती लागल्याने येणार्‍या काळात बुलडाण्यातील काँग्रेसही राहुल मय होईल, हे स्पष्टच होत आहे.निलंबनाबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची आगामी भूमिका मांडली यावेळी निलंबित आमदार राहुल बोंद्रे व प्रत्यक्षदश्री आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. आपली बाजू मांडत असताना सरकारच्या भूमिकेचा परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील विरोधाभासी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले व या प्रकरणातील एकूणच भूमिका मांडताना सरकारने जाणीवपूर्वक हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे या प्रकरणातील राजकारण आता राज्यस्तरावर रंगणार असून, त्याचे पडसाद जिल्हास्तवरही पडतील. येणार्‍या हिवाळी अधिवेशनापर्यंत हा मुद्दा ताणून धरला जाईल. या निमित्ताने भाजपाने राष्ट्रवादीचा घेतलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, सेनेची सत्तेत सहभाग घेण्यासाठी होत असलेली ससेहोलपट या मुद्यांवर काँग्रेसला या दोन्ही पक्षांना सहज टार्गेट करता येणे शक्य आहे, या मुद्यावर भाजपा बचावात्मक पवित्र्यात आहे त्यामुळे भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेसला आधी एकसंघ होण्याची गरज आहे.    या पृष्ठभूमीवर राहुल बोंद्रे यांचे निलंबन हेच हत्यार म्हणून काँग्रेसने हातात घेतले असल्याने मरगळलेल्या पक्षामध्ये काही प्रमाणात चेतना येईल व विरोधकांवरही राजकीय वार करता येईल. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस याचा प्रभावी वापर कसा करते, यावरही काँग्रेसची दिशा अवलंबून आहे.*स्वाभिमानी पुन्हा सोयाबीन आंदोलनातभाजपाच्या सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चार गडी राखत मनातल्या मनात शरद पवारांचे नाव घेऊन विश्‍वासमत प्रस्ताव जिंकला. या चार गड्यांमध्ये मेटे, आठवले, जानकरांसोबतच शेट्टी यांचाही समावेश आहे. याच स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे खंदे सर्मथक पहिल्या फळीचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा मूळ भूमिकेत येत सोयाबीन व कापूस प्रश्नावर हात घालून आंदोलनाची हाक दिली. *मनसे नव्या विठोबाच्या शोधातमनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद सदस्य बुलडाण्याने विनोद वाघ यांच्या रूपाने दिला. वाघ यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसेला चर्चेत ठेवले; मात्र त्यांच्या आंदोलनात मुख्य टार्गेट हे राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे कायमच राहिले. वाघ यांच्या विरोधाने शिंगणे यांच्या मार्गात काहीही अडकाठी आली नाही. यावेळी मात्र निवडणुकीच्या मार्गावर शिंगणे नव्हतेच तरीही वाघ यांना पराभव पाहावा लागला.