शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील उर्दू शिक्षकांवर गंडांतर

By admin | Updated: November 17, 2016 17:25 IST

दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना स्व जिल्ह्यात बदली करुण घेण्यासाठी आंतरजिल्हा बदली नुसार नियम लावण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 17 : दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना   स्व जिल्ह्यात बदली करुण घेण्यासाठी आंतरजिल्हा बदली नुसार नियम लावण्यात आले आहेत. मात्र  या नियमांच्या फेऱ्यात राज्यभरातील उर्दू माध्यमांचे शिक्षक  अडकले आहेत. या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक शिक्षक शिक्षण विभाग कार्यालयात मागील पाच वर्षापासून चकरा मारीत आहेत. या संदर्भात शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने जवाबदारी झटकल्याचा आरोप शिक्षण संघटनेकडून केला जात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्वत्र उर्दू माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. प्राथमिक विभागाच्यावतीने  पात्र डीएड बीएड धारकांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काहींची निवड जिल्ह्यात झाली आह, तर काहींची निवड, रत्नागिरी, रायगड, बीड, उस्मानाबाद, अकोला, नांदेड, वाशिम इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात झाली आहे. अनेक शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक झाली आहे त्यामुळे नियमानुसार  ते  शिक्षक स्वत जिल्ह्यात बदलीची मागणी करीत आहेत.

आता पर्यत जिल्हा परिषदेकडे ७० पेक्षा जास्त प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने खुला प्रवर्गातील बिंदू हे अतिरिक्त असल्याने आंतर जिल्हा बदली मधून येणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना घेण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी उर्दू माध्यमांचे प्राथमिक शिक्षक नसल्याने विद्यार्थांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच मराठी माध्यमातील अनेक शिक्षकांनी एकतर्फा आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव पाठविला असता जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांना पदस्थापना देण्यात आल्याचा  आरोप अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटन प्रणित आंतर जिल्हा बदली उर्दू शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना आंतर जिल्हा बदली देवून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघर्ष समीतीचे शेख जाफर पटेल, शेख बिस्मिला नुरा, अ‍ॅड मतीन अहमदन खान,नाझनीन इर्शाद खान आदींच्यावतीने करण्यात आली आहे.                             प्राथमिक शिक्षकांची अशी आहे अडचण  जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचे  एसस्सी,एसटी, वीजेएनटी, एसबीसी आदी जाती अंतर्गत असलेले आरक्षीत पद रिक्त आहेत. मुस्लिम समाजात या प्रवर्गातील पात्र उमेदवारांची संख्या कमी आहे, त्यामुळे आरक्षीत असलेल्या जागी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळत नाही.संघटनेची अशी आहे मागणी शिक्षण विभागात ७ नोव्हेबर २००१ रोजी शासनाच्यावतीने आदेश पास करण्यात आला आहे, यात आरक्षणाची पदे उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवार घेण्यात यावे अशी तरतुद करण्यात आली आहे. आंतर जिल्हा बदलीने समावून घेताना जिल्हा परिषद ही सरळसेवेच्या जागेवर व शुन्य जेष्ठतेने समावून घेते, मग त्यांची सेवाही नविनच सुरु होते. त्यामुळे सदर शासन निर्णयाची तरतुद या आंतरजिल्हा बदलीसाठी लागू करण्यात यावी, अशी मागणी संघटनेची आहे.