शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्यभरातील उर्दू शिक्षकांवर गंडांतर

By admin | Updated: November 17, 2016 17:25 IST

दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना स्व जिल्ह्यात बदली करुण घेण्यासाठी आंतरजिल्हा बदली नुसार नियम लावण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 17 : दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना   स्व जिल्ह्यात बदली करुण घेण्यासाठी आंतरजिल्हा बदली नुसार नियम लावण्यात आले आहेत. मात्र  या नियमांच्या फेऱ्यात राज्यभरातील उर्दू माध्यमांचे शिक्षक  अडकले आहेत. या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक शिक्षक शिक्षण विभाग कार्यालयात मागील पाच वर्षापासून चकरा मारीत आहेत. या संदर्भात शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने जवाबदारी झटकल्याचा आरोप शिक्षण संघटनेकडून केला जात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्वत्र उर्दू माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. प्राथमिक विभागाच्यावतीने  पात्र डीएड बीएड धारकांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काहींची निवड जिल्ह्यात झाली आह, तर काहींची निवड, रत्नागिरी, रायगड, बीड, उस्मानाबाद, अकोला, नांदेड, वाशिम इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात झाली आहे. अनेक शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक झाली आहे त्यामुळे नियमानुसार  ते  शिक्षक स्वत जिल्ह्यात बदलीची मागणी करीत आहेत.

आता पर्यत जिल्हा परिषदेकडे ७० पेक्षा जास्त प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने खुला प्रवर्गातील बिंदू हे अतिरिक्त असल्याने आंतर जिल्हा बदली मधून येणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना घेण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी उर्दू माध्यमांचे प्राथमिक शिक्षक नसल्याने विद्यार्थांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच मराठी माध्यमातील अनेक शिक्षकांनी एकतर्फा आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव पाठविला असता जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांना पदस्थापना देण्यात आल्याचा  आरोप अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटन प्रणित आंतर जिल्हा बदली उर्दू शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना आंतर जिल्हा बदली देवून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघर्ष समीतीचे शेख जाफर पटेल, शेख बिस्मिला नुरा, अ‍ॅड मतीन अहमदन खान,नाझनीन इर्शाद खान आदींच्यावतीने करण्यात आली आहे.                             प्राथमिक शिक्षकांची अशी आहे अडचण  जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचे  एसस्सी,एसटी, वीजेएनटी, एसबीसी आदी जाती अंतर्गत असलेले आरक्षीत पद रिक्त आहेत. मुस्लिम समाजात या प्रवर्गातील पात्र उमेदवारांची संख्या कमी आहे, त्यामुळे आरक्षीत असलेल्या जागी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळत नाही.संघटनेची अशी आहे मागणी शिक्षण विभागात ७ नोव्हेबर २००१ रोजी शासनाच्यावतीने आदेश पास करण्यात आला आहे, यात आरक्षणाची पदे उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवार घेण्यात यावे अशी तरतुद करण्यात आली आहे. आंतर जिल्हा बदलीने समावून घेताना जिल्हा परिषद ही सरळसेवेच्या जागेवर व शुन्य जेष्ठतेने समावून घेते, मग त्यांची सेवाही नविनच सुरु होते. त्यामुळे सदर शासन निर्णयाची तरतुद या आंतरजिल्हा बदलीसाठी लागू करण्यात यावी, अशी मागणी संघटनेची आहे.