शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावातील ३८ शेततळे पुर्ण, ९२ बंधाऱ्यांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:20 IST

जळगाव जामोद :  तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रचंड वेग आला आहे. शेतकरी वर्गाच्या सक्रीय सहभागामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत असणारी शेततळे, सिमेंट नाला बांध, जुन्या सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण या कामांना गती मिळाली आहे.

ठळक मुद्देसन २०१६-१७ मध्ये १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करावयाची होती. पैकी १४ गावातील कामे पुर्ण झाली असून ४ गावातील कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद :  तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रचंड वेग आला आहे. शेतकरी वर्गाच्या सक्रीय सहभागामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत असणारी शेततळे, सिमेंट नाला बांध, जुन्या सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण या कामांना गती मिळाली आहे. पाणी अडविण्याची व जमिनीत मुरविण्याची प्रक्रिया झाल्याशिवाय शेतीचे भविष्य कठीण आहे. हा विचार सर्व शेतकरी बांधवांना भावल्यामुळे शासनाच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.सन २०१६-१७ मध्ये १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करावयाची होती. पैकी १४ गावातील कामे पुर्ण झाली असून ४ गावातील कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामांवर प्रस्तावित खर्च १७० लक्ष होता. त्यापैकी ११४ लाख खर्च झाले असून ८७ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १८ कामे प्रगतीपथावर असून त्यावर ५५ लाख खर्च होणे अपेक्षित आहे. सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवारसाठी १५ गावांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये भेंडवळ खुर्द, आसलगाव, हनवतखेड, इस्लामपूर, गारपेठ, पिंप्री खोद्री, भुरखेड, करणवाडी, खामखेड, उटी बु., उटी खुर्द, सुलज, इलोरा, सुनगाव व निंभोरा खुर्द या गावांचा समावेश होता.सुनगाव येथील ४ शेततळे पुर्ण झाली असून १७ पैकी १६ बंधारा खोलीकरणाची कामे भारतीय जैन संघटनेच्या सहयोगातून पूर्ण झाली आहेत. करणवाडीची २३ कामे बीजेएसच्या सहकार्याने पूर्ण करणार असून आसलगावची ६ खोलीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. तीन खोलीकरणाची कामे प्रगतीवर असून १२ शेततळे पूर्ण झाली आहेत. सन २०१७-१८ मध्ये ४१ शेततळ्यांपैकी ३८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून ३ शेततळे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याकरीता १४८ लाखाचा खर्च प्रस्तावित आहे. सध्या सर्व जेसीबी पाणी फाऊंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कार्यरत आहेत. २३ मे पासून ही स्पर्धा संपणार असून त्यानंतर भारतीय जैन संघटनेच्या ह्या सर्व जेसीबी जलयुक्त शिवारच्या कामात येणार असून त्यानंतर उर्वरीत खोलीकरणाच्या कामाला आणखी वेग येईल.सन २०१८-१९ साठी जलयुक्त शिवार अभियानाकरीता तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून या गावातील शिवार फेºया पूर्ण झाल्या आहेत. या गावांचा आराखडा तयार झाल्यानंतर येथील शेततळे व खोलीकरण या कामांना सुरूवात होईल. तसेच या कामासाठी किर्ती खर्च अपेक्षित आहे. याचाही अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.

 कृषी विभागाअंतर्गत सर्वाधिक कामेजलयुक्त शिवारची सर्वाधिक कामे कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून इतर विभागाची कामे सुध्दा छोट्या प्रमाणावर सुरू आहेत. कृषी विभागासोबतच जिल्हा परिषद सिंचन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वरिष्ठ भुवैज्ञानिक विभाग यांचीही कामे अल्प प्रमाणात सुरू  आहेत. कारण कृषी विभागाशिवाय अन्य विभागाकडे असणारा निधी व कार्यक्षेत्र कमी असल्याने त्यांची जलयुक्त शिवारची कामे त्या प्रमाणात सुरू आहेत. एकुणच जलयुक्त शिवारचे महत्व शेतकरी, नागरीक, अधिकारी व कमृचारी यांना कळल्याने तालुक्यात या कामांना बºयापैकी वेग आहे. तसेच तालुक्यातील ५६ गावे पाणी फाऊंडेशन वाटर कप स्पर्धेत सहभागी असल्याने त्या गावांमध्येही पाणी अडविण्याची, साठविण्याची व मुरवण्याची मोठी कामे झाली आहे. 

जलयुक्त शिवारची कामे कृषी विभागामार्फत १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काही कामे अपूर्ण राहिल्यास तीन ३० जूनपुर्वी पुर्ण केली जातील.- संदीप निमकर्डे, प्र.तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदJalyukt Shivarजलयुक्त शिवार