शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करा : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून, त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे ...

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून, त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे आहे. या विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामाचा अतिरिक्त बोजा कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गती संथ झाली आहे. बुलडाणा जीवन प्राधिकरण विभागांतर्गत येणाऱ्या बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद येथे आकृतिबंधानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ८० पदे मंजूर आहेत. सध्या कार्यरत पदे केवळ १७ भरलेली असून, ६३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून, पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्णत्वास जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तेव्हा रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन खासदार प्रतापराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी त्यांच्यासोबत बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते.