शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार अर्थसहाय्य योजनेत अपहार झाल्याची तक्रार

By admin | Updated: May 2, 2017 23:28 IST

बुलडाणा- बारा बलुतेदार अर्थसहाय्य योजनेत अपहार झाल्याची तक्रार बारा बलुतेदार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बुलडाणा: बारा बलुतेदारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी १५ वर्षापूर्वी राज्य शासनाने अर्थसहाय्य योजना राबविली; परंतु तत्कालीन जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून या योजनेत अपहार केला असून, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारा बलुतेदार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात नमूद आहे की, सन २००२-०४ च्या दरम्यान तत्कालीन राज्य सरकारने राज्यातील बारा बलुतेदारांच्या उन्नतीसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबविली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला त्या-त्या जिल्ह्यातील बलुतेदारांच्या व्यवसायांना पतपुरवठा करण्याचे निर्देश तत्कालीन सहकार आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले होते; मात्र जिल्हा उपनिबंधक व जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला. या योजनेतून जिल्ह्यात ५८ लाभार्थींना प्रत्येकी ३० हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात आले; मात्र यापैकी केवळ ५ लाभार्थी खरे बलुतेदार आहेत. उर्वरित ५३ महिला लाभार्थींपैकी १० महिला केडर अधिकाऱ्यांच्या पत्नी, ४ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पत्नी, ६ पतसंस्था कर्मचाऱ्यांच्या पत्नी, ३० लाभार्थी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांच्या पत्नी, १ लाभार्थी तालुका उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याची पत्नी तर २ लाभार्थी पाडळी येथील संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पत्नी असल्याचे नमूद करून ५३ लाभार्थी बोगस असल्यामुळे या योजनेत अपहार झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.