शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

अन्नपुरवठा मंत्र्यांकडे करणार तक्रार - रायमुलकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:20 IST

मेहकर: स्वस्त धान्य योजना गोरगरिबांसाठी लाभदायक असली  तरी काही महिन्यांपासून जिल्हय़ात रेशनच्या अन्नधान्याची अफरा तफर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट या संस्थेला  बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच अन्नधान्याचे कंत्राट मिळाल्यापासून  अन्नधान्याचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब जनता  अन्नधान्यापासून वंचित राहत आहे. यासंदर्भात चौकशी करून ही  संस्था काळ्या यादीत टाकण्यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा वरिष्ठ  अधिकार्‍यांकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याची माहिती आ.  संजय रायमुलकर यांनी दिली. 

ठळक मुद्देजिल्हय़ात श्रीनाथ ट्रान्सपोर्टमुळे अन्नधान्याची अफरातफर वाढली जनुना, सोनाटी येथील प्रकरणाची चौकशी व्हावी!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: स्वस्त धान्य योजना गोरगरिबांसाठी लाभदायक असली  तरी काही महिन्यांपासून जिल्हय़ात रेशनच्या अन्नधान्याची अफरा तफर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट या संस्थेला  बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच अन्नधान्याचे कंत्राट मिळाल्यापासून  अन्नधान्याचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब जनता  अन्नधान्यापासून वंचित राहत आहे. यासंदर्भात चौकशी करून ही  संस्था काळ्या यादीत टाकण्यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा वरिष्ठ  अधिकार्‍यांकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याची माहिती आ.  संजय रायमुलकर यांनी दिली. शासनाने स्वस्त धान्य दुकानांमधून शहरी तथा ग्रामीण भागातील  गोरगरीब अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, आदींसाठी गहू,  साखर, तांदूळ, तेल उपलब्ध करून दिले आहे. सदर अन्नधान्य  गरिबांना मिळणे गरजेचे आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच  माल मिळावा, अन्नधान्याचा काळाबाजार बंद व्हावा, यासाठी  शासनाने द्वारपोच अन्नधान्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा  बुलडाणा जिल्हय़ाचा कंत्राट श्रीनाथ ट्रान्सपोर्टचे राजू गुप्त यांना  देण्यात आला आहे; परंतु जिल्ह्यामध्ये अन्नधान्याचा काळाबाजार  वाढला आहे. चिखली, अमडापूर, साखरखेर्डा, जनुना, सोनाटी  यासह घाटाखालीसुद्धा अनेक वेळा गहू व तांदुळाच्या गाड्या  पकडण्यात आल्या आहेत; परंतु गाड्या पकडल्यानंतर ते वाहन  कोणाचे, माल हा कोणत्या दुकानदाराचा आहे. कोणाच्या  सांगण्यावरून अन्नधान्याची अफरातफर सुरू होती, याची चौकशी  न होता, केवळ मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल करून ही सर्व  प्रकरणे दाबण्यात आली आहेत.      या मागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा अजूनही थांगपत्ता लागलेला  नाही. बुलडाणा जिल्हय़ातील अन्नधान्याचा माल हा लोणार मार्गे लोणी  सखाराम महाराज, मंठा, नागपूर आदी भागात नेऊन खुलेआम  विकल्याचे आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले आहे. राजू गुप्ता  यांनी जिल्हय़ातील प्रत्येक अन्नधान्याच्या गोडाऊनवर तुरळक  पगारावर वाहतूक प्रतिनिधी नेमले आहे. राजू गुप्ता यांचे कोणतेच  नियंत्रण द्वारपोच याजनेवर नाही. केवळ फोनवरच सर्व कारभार  सुरू आहे. जिल्हय़ात झालेल्या अन्नधान्याच्या काळ्या बाजाराचे  पुरावे आहेत. तर ठिकठिकाणच्या अन्नपुरवठा अधिकार्‍यांनी  कारवाईचे काय केले, याचे पुरावे आमच्याकडे असून राजू गुप्ता  यांच्याकडून सदर कंत्राट काढून घ्यावे, तसेच आतापर्यंत ज्या ज्या  ठिकाणी माल पकडला त्या-त्या ठिकाणच्या अन्नपुरवठा  अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, यासाठी  अन्नपुरवठा मंत्री तथा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे  पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे आमदार संजय रायमुलकर  यांनी सांगितले. 

जनुना, सोनाटी येथील प्रकरणाची चौकशी व्हावी!मेहकर तालुक्यातील सोनाटी व जनुना येथे काही दिवसांपूर्वी  तांदुळाचा माल पकडण्यात आला होता; परंतु या मालाची चौकशी  अद्यापही पूर्ण झाली नसून, कोणावरही कारवाई झाली नाही.  सोनाटी येथील तांदूळ हा एका खासगी व्यक्तीचा असल्याचे अन्न पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले; मात्र जर हा माल खासगी  व्यक्तीचा आहे तर मग तो माल मेहकर येथील गोडाऊनला का  ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत  चौकशी करण्याची मागणी होत आहे.