शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपुरवठा मंत्र्यांकडे करणार तक्रार - रायमुलकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:20 IST

मेहकर: स्वस्त धान्य योजना गोरगरिबांसाठी लाभदायक असली  तरी काही महिन्यांपासून जिल्हय़ात रेशनच्या अन्नधान्याची अफरा तफर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट या संस्थेला  बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच अन्नधान्याचे कंत्राट मिळाल्यापासून  अन्नधान्याचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब जनता  अन्नधान्यापासून वंचित राहत आहे. यासंदर्भात चौकशी करून ही  संस्था काळ्या यादीत टाकण्यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा वरिष्ठ  अधिकार्‍यांकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याची माहिती आ.  संजय रायमुलकर यांनी दिली. 

ठळक मुद्देजिल्हय़ात श्रीनाथ ट्रान्सपोर्टमुळे अन्नधान्याची अफरातफर वाढली जनुना, सोनाटी येथील प्रकरणाची चौकशी व्हावी!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: स्वस्त धान्य योजना गोरगरिबांसाठी लाभदायक असली  तरी काही महिन्यांपासून जिल्हय़ात रेशनच्या अन्नधान्याची अफरा तफर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट या संस्थेला  बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच अन्नधान्याचे कंत्राट मिळाल्यापासून  अन्नधान्याचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब जनता  अन्नधान्यापासून वंचित राहत आहे. यासंदर्भात चौकशी करून ही  संस्था काळ्या यादीत टाकण्यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा वरिष्ठ  अधिकार्‍यांकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याची माहिती आ.  संजय रायमुलकर यांनी दिली. शासनाने स्वस्त धान्य दुकानांमधून शहरी तथा ग्रामीण भागातील  गोरगरीब अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, आदींसाठी गहू,  साखर, तांदूळ, तेल उपलब्ध करून दिले आहे. सदर अन्नधान्य  गरिबांना मिळणे गरजेचे आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच  माल मिळावा, अन्नधान्याचा काळाबाजार बंद व्हावा, यासाठी  शासनाने द्वारपोच अन्नधान्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा  बुलडाणा जिल्हय़ाचा कंत्राट श्रीनाथ ट्रान्सपोर्टचे राजू गुप्त यांना  देण्यात आला आहे; परंतु जिल्ह्यामध्ये अन्नधान्याचा काळाबाजार  वाढला आहे. चिखली, अमडापूर, साखरखेर्डा, जनुना, सोनाटी  यासह घाटाखालीसुद्धा अनेक वेळा गहू व तांदुळाच्या गाड्या  पकडण्यात आल्या आहेत; परंतु गाड्या पकडल्यानंतर ते वाहन  कोणाचे, माल हा कोणत्या दुकानदाराचा आहे. कोणाच्या  सांगण्यावरून अन्नधान्याची अफरातफर सुरू होती, याची चौकशी  न होता, केवळ मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल करून ही सर्व  प्रकरणे दाबण्यात आली आहेत.      या मागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा अजूनही थांगपत्ता लागलेला  नाही. बुलडाणा जिल्हय़ातील अन्नधान्याचा माल हा लोणार मार्गे लोणी  सखाराम महाराज, मंठा, नागपूर आदी भागात नेऊन खुलेआम  विकल्याचे आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले आहे. राजू गुप्ता  यांनी जिल्हय़ातील प्रत्येक अन्नधान्याच्या गोडाऊनवर तुरळक  पगारावर वाहतूक प्रतिनिधी नेमले आहे. राजू गुप्ता यांचे कोणतेच  नियंत्रण द्वारपोच याजनेवर नाही. केवळ फोनवरच सर्व कारभार  सुरू आहे. जिल्हय़ात झालेल्या अन्नधान्याच्या काळ्या बाजाराचे  पुरावे आहेत. तर ठिकठिकाणच्या अन्नपुरवठा अधिकार्‍यांनी  कारवाईचे काय केले, याचे पुरावे आमच्याकडे असून राजू गुप्ता  यांच्याकडून सदर कंत्राट काढून घ्यावे, तसेच आतापर्यंत ज्या ज्या  ठिकाणी माल पकडला त्या-त्या ठिकाणच्या अन्नपुरवठा  अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, यासाठी  अन्नपुरवठा मंत्री तथा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे  पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे आमदार संजय रायमुलकर  यांनी सांगितले. 

जनुना, सोनाटी येथील प्रकरणाची चौकशी व्हावी!मेहकर तालुक्यातील सोनाटी व जनुना येथे काही दिवसांपूर्वी  तांदुळाचा माल पकडण्यात आला होता; परंतु या मालाची चौकशी  अद्यापही पूर्ण झाली नसून, कोणावरही कारवाई झाली नाही.  सोनाटी येथील तांदूळ हा एका खासगी व्यक्तीचा असल्याचे अन्न पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले; मात्र जर हा माल खासगी  व्यक्तीचा आहे तर मग तो माल मेहकर येथील गोडाऊनला का  ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत  चौकशी करण्याची मागणी होत आहे.