शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!

By admin | Updated: April 20, 2017 00:02 IST

खामगाव पालिकेतील ‘राज’कारण पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

खामगाव : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले; मात्र या आंदोलनाचा काहीच उपयोग न झाल्याने, बुधवारी सकाळी काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर खामगाव पालिकेतील राजकारण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचल्याची चर्चा होत आहे. येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, या आंदोलनाची मुख्याधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे धडक दिली. सकाळी १० वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुख्याधिकाऱ्यांची तक्रार केली. यामध्ये खामगाव नगरपालिकेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला. पालिकेत बहुमताच्या जोरावर नियमबाह्य आणि गैरकायदेशीर ठराव पारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद असून, मुख्याधिकारी राजकीय दबावातून सत्ताधाऱ्यांनी मनमानी खपवून घेत असल्याचे काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी तक्रारीत नमूद केले आहे. चौकशीचे आश्वासनपालिकेतील गैरकाराभाराची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस-आघाडी नगरसेवकांना दिल्याची माहिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभारासह मुख्याधिकाऱ्यांचीही तक्रार काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. या तक्रारीवर काँग्रेस आघाडीच्या १३ नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत.