शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST

बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी हवालदिल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.ना.तुपकर यांनी शुक्रवारी खुपगाव, सव, किन्होळा आणि रुईखेड  शिवारातील शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची पाहणी  केली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे तहसीलदार सुरेश बगळे,  तालुका कृषी अधिकारी अनिल भांबरे, पंचायत समितीचे कृषी  अधिकारी आय.एन.इंगळे, कृषी पर्यवेक्षक आर.टी.पवार, कृषी  सहायक जितेंद्र केकाण उपस्थित होते. या पीक पाहणीनंतर त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात ना.रविकांत  तुपकर यांनी म्हटले आहे की, विदर्भात मागील एक महिन्यापासून  पाऊस नाही. पावसाअभावी शेतकर्‍यांची खरिपाची पेरणी वाया  गेली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सोयाबीन, उडीद, मूग व का पूस पीक सुकून गेले आहे. अनेक शेतकर्‍यांनी अक्षरश: उभ्या  िपकामध्ये नांगर घातले आहेत. मागील वर्षी शेतकर्‍यांच्या  सोयाबीन व तुरीला भाव मिळाला नाही. शासनाने जाहीर केलेल्या  कर्जमाफीचाही शेतकर्‍यांना लाभ झाला नाही. त्यातच यावर्षी पुन्हा  निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांसमोर दुष्काळाचे संकट उभे  ठाकले आहे. सततचा दुष्काळ, कर्ज व नापिकीमुळे विदर्भातील  शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेनात, असे असताना शे तकर्‍यांवर पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. यावर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शे तकर्‍यांच्या सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या पिकांचे पंचनामे  करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मु ख्यमंत्री ना.फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पीक  पाहणी दौर्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, जिल्हा  उपाध्यक्ष अनिल पडोळ, कैलास जाधव आदी उपस्थित होते.