शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

सुकलेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:26 IST

बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देरविकांत तुपकर यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी हवालदिल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्‍यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी  हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून  शासनाने शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी, अशी  मागणी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.ना.तुपकर यांनी शुक्रवारी खुपगाव, सव, किन्होळा आणि रुईखेड  शिवारातील शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष शेतात जावून पिकांची पाहणी  केली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे तहसीलदार सुरेश बगळे,  तालुका कृषी अधिकारी अनिल भांबरे, पंचायत समितीचे कृषी  अधिकारी आय.एन.इंगळे, कृषी पर्यवेक्षक आर.टी.पवार, कृषी  सहायक जितेंद्र केकाण उपस्थित होते. या पीक पाहणीनंतर त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. या पत्रात ना.रविकांत  तुपकर यांनी म्हटले आहे की, विदर्भात मागील एक महिन्यापासून  पाऊस नाही. पावसाअभावी शेतकर्‍यांची खरिपाची पेरणी वाया  गेली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सोयाबीन, उडीद, मूग व का पूस पीक सुकून गेले आहे. अनेक शेतकर्‍यांनी अक्षरश: उभ्या  िपकामध्ये नांगर घातले आहेत. मागील वर्षी शेतकर्‍यांच्या  सोयाबीन व तुरीला भाव मिळाला नाही. शासनाने जाहीर केलेल्या  कर्जमाफीचाही शेतकर्‍यांना लाभ झाला नाही. त्यातच यावर्षी पुन्हा  निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकर्‍यांसमोर दुष्काळाचे संकट उभे  ठाकले आहे. सततचा दुष्काळ, कर्ज व नापिकीमुळे विदर्भातील  शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेनात, असे असताना शे तकर्‍यांवर पुन्हा दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. यावर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शे तकर्‍यांच्या सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी या पिकांचे पंचनामे  करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मु ख्यमंत्री ना.फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पीक  पाहणी दौर्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन, जिल्हा  उपाध्यक्ष अनिल पडोळ, कैलास जाधव आदी उपस्थित होते.