शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

टीका- टिप्पणीने गाजली खामगाव पालिकेची सभा

By admin | Updated: July 2, 2017 09:12 IST

सभेत तब्बल ३२ विषयांना मंजुरी; बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी आयोजित सभेत, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर केलेल्या टीका-टिप्पणीमुळे शनिवारची सभा चांगलीच गाजली. तथापि, या सभेत तब्बल ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामधील बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले.नगरपालिकेमध्ये आयोजित सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करणे, नगर परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग जोडणे, पालिकेतील वाहनांवर अभिकर्त्यांमार्फत वाहनचालकाची सेवा पुरविण्याबाबतच्या वार्षिक कंत्राटास मंजुरी देणे, फेरीवाला झोन ठरविण्यासाठी विचार विनिमय करून निर्णय घेणे, यांसह विविध विषयांच्या मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली. यापैकी बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले. दरम्यान, या सभेत विरोधी सदस्यांकडून कोणतीही उपसूचना न आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी विषयाला सोडून वैयक्तिक टीका-टिप्पणी झाल्याने, पालिकेची ही सभा चांगलीच गाजली. या सभेला नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले, पाणी पुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, संदीप वर्मा, अलकादेवी सानंदा, अमय सानंदा, ओम शर्मा, देवेंद्र देशमुख विजय वानखडे, हिरालाल बोर्डे, प्रवीण कदम, भूषण शिंदे आदींची उपस्थिती होती. पालिकेतील सभेची सुरुवात राष्ट्रगीताने! नगरपालिकेतील आयोजित प्रत्येक सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्याच्या ठरावाला शनिवारी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेत आयोजित सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यासाठी नगरसेवक ओम शर्मा यांनी पालिकेला पत्र दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनीही हा विषय सुचविला होता. या विषयावरून पालिकेची मागील सभा चांगलीच गाजली होती. शहरातील चारही पाणी टाक्यांची जोडणी!वाढीव पाणी पुरवठा योजनेची गती वाढविण्यासाठी शहरात कार्यान्वित असलेल्या चार पाण्याच्या टाक्यांच्या अंतर्गत जोडणीच्या विषयाला शनिवारी मंजुरी देण्यात आली. चारही पाण्याच्या टाक्यांची जोडणी झाल्यास शहरातील पाणीटंचाई संपणार आहे.