शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

टीका- टिप्पणीने गाजली खामगाव पालिकेची सभा

By admin | Updated: July 2, 2017 09:12 IST

सभेत तब्बल ३२ विषयांना मंजुरी; बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी आयोजित सभेत, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर केलेल्या टीका-टिप्पणीमुळे शनिवारची सभा चांगलीच गाजली. तथापि, या सभेत तब्बल ३२ विषयांना मंजुरी देण्यात आली. यामधील बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले.नगरपालिकेमध्ये आयोजित सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करणे, नगर परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ ते ८ वीचे वर्ग जोडणे, पालिकेतील वाहनांवर अभिकर्त्यांमार्फत वाहनचालकाची सेवा पुरविण्याबाबतच्या वार्षिक कंत्राटास मंजुरी देणे, फेरीवाला झोन ठरविण्यासाठी विचार विनिमय करून निर्णय घेणे, यांसह विविध विषयांच्या मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली. यापैकी बहुतांश विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत झाले. दरम्यान, या सभेत विरोधी सदस्यांकडून कोणतीही उपसूचना न आल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी विषयाला सोडून वैयक्तिक टीका-टिप्पणी झाल्याने, पालिकेची ही सभा चांगलीच गाजली. या सभेला नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले, पाणी पुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, संदीप वर्मा, अलकादेवी सानंदा, अमय सानंदा, ओम शर्मा, देवेंद्र देशमुख विजय वानखडे, हिरालाल बोर्डे, प्रवीण कदम, भूषण शिंदे आदींची उपस्थिती होती. पालिकेतील सभेची सुरुवात राष्ट्रगीताने! नगरपालिकेतील आयोजित प्रत्येक सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्याच्या ठरावाला शनिवारी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेत आयोजित सभेची सुरूवात राष्ट्रगीताने करण्यासाठी नगरसेवक ओम शर्मा यांनी पालिकेला पत्र दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनीही हा विषय सुचविला होता. या विषयावरून पालिकेची मागील सभा चांगलीच गाजली होती. शहरातील चारही पाणी टाक्यांची जोडणी!वाढीव पाणी पुरवठा योजनेची गती वाढविण्यासाठी शहरात कार्यान्वित असलेल्या चार पाण्याच्या टाक्यांच्या अंतर्गत जोडणीच्या विषयाला शनिवारी मंजुरी देण्यात आली. चारही पाण्याच्या टाक्यांची जोडणी झाल्यास शहरातील पाणीटंचाई संपणार आहे.