शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

शासनाकडून रिक्षाचालकांच्या माहितीचे संकलनच अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या रिक्षाचालकांना दीड हजारांची मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या रिक्षाचालकांना दीड हजारांची मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, याकरिता जिल्ह्यातील रिक्षाचालकांची परिपूर्ण माहितीच शासनाकडून अद्याप संकलित करण्यात आलेली नाही. यामुळे शासनाची घोषणा केवळ वाऱ्यावरच असून, जिल्ह्यातील रिक्षाचालक माहितीच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे.

रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे. यानुसार, केवळ जिल्ह्यातील परवानाधारक व कागदपत्रे ‘व्हॅलिड’ असलेल्या रिक्षाचालकांचा आकडा संकलित करण्यात आला आहे. केवळ या आकड्यावरून रिक्षाचालकांना मदत देणे शक्य नाही. मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रिक्षाचालकांची नावे, पत्ते, वाहनाचा क्रमांक व बँक खाते क्रमांकासह इतर माहिती प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. मात्र, अशा प्रकारची सविस्तर माहिती शासनाने बुलडाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून आतापर्यंत मागविली नाही. याचाच अर्थ असा की, जिल्ह्यातील रिक्षाचालकांना मदत देण्याची प्रक्रियाच अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे सरसकट नव्हे, तर पात्र असलेल्या रिक्षाचालकांना तरी अनुदान केव्हा मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या खासगी वाहतूक बंद असून, केवळ अत्यावश्यक कामांसाठी वाहतुकीसाठी परवानगी आहे. यामुळे रिक्षाचालकांना इतर व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे. इतर व्यवसायांनाही लॉकडाऊनचा फटका बसत असल्याने उदरनिर्वाह भागविणे कठीण झाले आहे.

-मोहम्मद आसिफ, रिक्षाचालक

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक बाहेर पडणे टाळत असल्याने प्रवासी मिळत नाहीत. यामुळे दिवसाला १०० रुपयेही मिळणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे शासनाने जाहीर केलेली दीड हजारांची मदत मिळाली, तर काही प्रमाणात आधार मिळू शकतो.

-विनोद बोंबटकार, रिक्षाचालक

शासनाने जाहीर केलेली मदत केवळ परवानाधारक रिक्षाचालकांना आहे. ज्यांच्याकडे परवाना नाही, अशा रिक्षाचालकांना ही मदत मिळणार नाही. त्यामुळे शासनाने कोणत्याही प्रकारचे निकष न लावता, सरसकट रिक्षाचालकांना ही मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.

-शेख शब्बीर, रिक्षाचालक

१३०० रिक्षाचालकांची कागदपत्रे व्हॅलिड

जिल्ह्यात जवळपास १५ हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. यापैकी कागदपत्रे ‘व्हॅलिड’ असलेले केवळ १ हजार ३०० रिक्षाचालक आहेत. ही सर्व माहिती बुलडाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आली आहे. व्हॅलिड असलेल्या रिक्षाचालकांची इतर सविस्तर माहितीही उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडे तयार आहे. मात्र, शासनाकडून आतापर्यंत अशी माहिती मागविण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.