शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस

By admin | Updated: January 2, 2015 00:40 IST

गारपिटीचाही तडाखा : खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात.

बुलडाणा : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या दुपारपर्यंंंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना रब्बी पिकापासून असलेली आशाही संपली. दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती या अवकाळी पावसामुळे झाली असून, जिल्हाभरात कमालीचा गारठा निर्माण झाला असून, सकाळपर्यंंत तब्बल ४३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मेहकर, सिंदेखडराजा, लोणार, शेगाव, खामगावातही पावसाने जोरदार हजेरी लावली. देऊळगावमही परिसरात वादळी वारा तसेच गारांचा पाऊस झाला. ३१ डिसेंबरच्या रात्रभर सुरू असलेला पाऊस १ जानेवारीला दुपारी १२ वाजेपर्यंंंत सुरूच होता. या पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये हरभरा, तूर, कपासी, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच डिग्रस येथे काही प्रमाणात द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्याला फटकासंग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारात झालेल्या गारपीटमुळे कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे, तर काकोडा, वकाणा गावामध्ये लिंबुच्या आकाराएवढी गार पडल्याने घरावरील कवेलु फुटले व ताडपत्री फाटल्या आहेत. वकाणा येथील गणेशराव खिरोडकार यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात ३१ डिसेंबरच्या रात्री हवा, पाऊस व गारांमुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला मातीमोल झाला आहे. कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून पात गारीने झोडपली.काकोडा येथील शत्रुघ्न मारखैर यांनी तहसील कार्यालयाकडे नुकसानीबाबत अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये गावातील कांदा, गहू, हरभरा व घरांवरील छतांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. गारांची संख्या व आकार पाहता बोरीच्या झाडांची बोरेही पुर्णत: गळून पडली आहेत. काकोडा गावात तर घरामध्ये गारांचा खच साचला होता. लगातार तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.*धाड भागात २८ हजार हेक्टरवर पेरणीक्षेत्र धोक्यातगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसासोबत ३१ डिसेंबर रोजी धाड भागात गारांचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले आहे. धाड, वरुड, सोयगाव, जामठी व चांडोळ परिसरात बोराएवढी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा, मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार दीपक बाजड यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी या पथकाने पाहणी केली असून, आर्थिक परिस्थितीने दबलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.