शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

अवकाळी पाऊस

By admin | Updated: January 2, 2015 00:40 IST

गारपिटीचाही तडाखा : खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात.

बुलडाणा : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या दुपारपर्यंंंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना रब्बी पिकापासून असलेली आशाही संपली. दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती या अवकाळी पावसामुळे झाली असून, जिल्हाभरात कमालीचा गारठा निर्माण झाला असून, सकाळपर्यंंत तब्बल ४३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मेहकर, सिंदेखडराजा, लोणार, शेगाव, खामगावातही पावसाने जोरदार हजेरी लावली. देऊळगावमही परिसरात वादळी वारा तसेच गारांचा पाऊस झाला. ३१ डिसेंबरच्या रात्रभर सुरू असलेला पाऊस १ जानेवारीला दुपारी १२ वाजेपर्यंंंत सुरूच होता. या पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये हरभरा, तूर, कपासी, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच डिग्रस येथे काही प्रमाणात द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्याला फटकासंग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारात झालेल्या गारपीटमुळे कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे, तर काकोडा, वकाणा गावामध्ये लिंबुच्या आकाराएवढी गार पडल्याने घरावरील कवेलु फुटले व ताडपत्री फाटल्या आहेत. वकाणा येथील गणेशराव खिरोडकार यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात ३१ डिसेंबरच्या रात्री हवा, पाऊस व गारांमुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला मातीमोल झाला आहे. कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून पात गारीने झोडपली.काकोडा येथील शत्रुघ्न मारखैर यांनी तहसील कार्यालयाकडे नुकसानीबाबत अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये गावातील कांदा, गहू, हरभरा व घरांवरील छतांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. गारांची संख्या व आकार पाहता बोरीच्या झाडांची बोरेही पुर्णत: गळून पडली आहेत. काकोडा गावात तर घरामध्ये गारांचा खच साचला होता. लगातार तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.*धाड भागात २८ हजार हेक्टरवर पेरणीक्षेत्र धोक्यातगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसासोबत ३१ डिसेंबर रोजी धाड भागात गारांचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले आहे. धाड, वरुड, सोयगाव, जामठी व चांडोळ परिसरात बोराएवढी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा, मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार दीपक बाजड यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी या पथकाने पाहणी केली असून, आर्थिक परिस्थितीने दबलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.