शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

अवकाळी पाऊस

By admin | Updated: January 2, 2015 00:40 IST

गारपिटीचाही तडाखा : खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात.

बुलडाणा : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या दुपारपर्यंंंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांना रब्बी पिकापासून असलेली आशाही संपली. दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती या अवकाळी पावसामुळे झाली असून, जिल्हाभरात कमालीचा गारठा निर्माण झाला असून, सकाळपर्यंंत तब्बल ४३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.मेहकर, सिंदेखडराजा, लोणार, शेगाव, खामगावातही पावसाने जोरदार हजेरी लावली. देऊळगावमही परिसरात वादळी वारा तसेच गारांचा पाऊस झाला. ३१ डिसेंबरच्या रात्रभर सुरू असलेला पाऊस १ जानेवारीला दुपारी १२ वाजेपर्यंंंत सुरूच होता. या पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये हरभरा, तूर, कपासी, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच डिग्रस येथे काही प्रमाणात द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्याला फटकासंग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारात झालेल्या गारपीटमुळे कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे, तर काकोडा, वकाणा गावामध्ये लिंबुच्या आकाराएवढी गार पडल्याने घरावरील कवेलु फुटले व ताडपत्री फाटल्या आहेत. वकाणा येथील गणेशराव खिरोडकार यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात ३१ डिसेंबरच्या रात्री हवा, पाऊस व गारांमुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला मातीमोल झाला आहे. कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून पात गारीने झोडपली.काकोडा येथील शत्रुघ्न मारखैर यांनी तहसील कार्यालयाकडे नुकसानीबाबत अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये गावातील कांदा, गहू, हरभरा व घरांवरील छतांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. गारांची संख्या व आकार पाहता बोरीच्या झाडांची बोरेही पुर्णत: गळून पडली आहेत. काकोडा गावात तर घरामध्ये गारांचा खच साचला होता. लगातार तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.*धाड भागात २८ हजार हेक्टरवर पेरणीक्षेत्र धोक्यातगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसासोबत ३१ डिसेंबर रोजी धाड भागात गारांचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले आहे. धाड, वरुड, सोयगाव, जामठी व चांडोळ परिसरात बोराएवढी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा, मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार दीपक बाजड यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी या पथकाने पाहणी केली असून, आर्थिक परिस्थितीने दबलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.