शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

थंडीत निघाला प्रवाशांचा घाम!

By admin | Updated: January 16, 2017 02:01 IST

एसटीला ‘दे धक्का’; बसचे वायर जळाले!

बुलडाणा, दि. १५- लोणारवरून बुलडाणा मार्गे भुसावळ व जळगाव जाणार्‍या बसची वायरिंग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार मेहकर-चिखली रोडवर हिवरा आश्रमपासून २ कि.मी. अंतरावर १५ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता घडला. प्रवाशांना एसटीला धक्का द्यावा लागल्याने बोचर्‍या थंडीत प्रवाशांचा घाम निघाला; मात्र एसटी चालू न झाल्याने सर्व प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागले. जिल्ह्यातील एसटीला ह्यदे धक्काह्ण म्हणण्याची वेळ वाहकासह प्रवाशांवर वारंवार येत आहे. भंगार एसटी बसचे प्रमाण वाढले असून, त्या बसेस सर्रास रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ह्यउशिरा जाईन पण एस.टी. नेच जाईनह्ण असे म्हणणार्‍या प्रवाशांची संख्या आजही मोठय़ा प्रमाणावर असल्याने, भंगार एसटीतूनही लांबचा प्रवास प्रवासी करतात. नवृत्तीच्या मार्गावर आलेल्या एसटी बसेस ग्रामीण भागातच नाहीतर माहामार्गावर सुद्धा पाठवल्या जात आहेत. त्यामुळे मध्येच एसटी बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मेहकर आगाराची एम.एच.४0 एन.८७९३ क्रमांकाची एसटी बस सकाळी ९ वाजता लोणारवरून जळगावसाठी निघाली. ही बस लोणार, मेहकर, लव्हाळा, चिखली, बुलडाणा, मुक्ताईनगर, भुसावळ त्यांनतर जळगाव पोहचणार होती. लांबपल्ल्याची एसटी बस असतानाही त्याची वायरिंग तपासण्याची तसदी घेतली जात नसल्याने लोणार-जळगाव जाणारी एसटी बसची वायरिंग हिवरा आश्रमपासून दोन कि.मी. अंतरावर जळून गेली. अचानक वायरिंग जळाल्याने एसटी बंद पडली. तेव्हा चालकांनी प्रवाशांना एसटीला धक्का देऊन एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. एसटीला धक्का देत असताना एसटी तर सुरू झाली नाही; मात्र बोचर्‍या थंडीत एसटीला धक्का देणार्‍या प्रवाशांचा चांगलाचा घाम निघाला. तेव्हा चालक व वाहकांनी सर्व प्रकार मेहकर आगाराला कळविला. कित्येक प्रवाशांना महत्वाच्या कामासाठी पुढे जायचे होते, मात्र एक तास दुसरी बस आली नसल्याने २५ ते ३0 प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले. एक तासानंतर दुसरी बस प्रवाशांनी फुल्ल होऊन आली असता, त्या बसमध्ये प्रवाशांना कोंबून देण्यात आले. रस्त्यावरच अशाप्रकारचे एसटी बस वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना एसटीचा प्रवास डोकेदु:खी ठरत आहे. भंगार बसचे प्रमाण वाढले!जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे भंगार एसटी बसेसचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातच नाही तर लांबपल्ल्यावरसुद्धा भंगार एसटी बसेस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांसाठी बसचा प्रवास डोकेदुखी ठरत आहे. काही ठिकाणी अचानक बसफेरी बंद केली जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे.