शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

खामगावातील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर घणाघात

By सदानंद सिरसाट | Updated: April 23, 2024 23:12 IST

ठाकरे यांच्या तोंडात जय भवानी, कामात बेइमानी

सदानंद सिरसाट, खामगाव : उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्या फक्त तोंडातच जय भवानी आहे. सर्वसामान्यांची आणि विकासकामे करताना त्यांच्यात बेइमानी असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खामगावातील प्रचारसभेत बोलताना केला.

शहरातील जे.व्ही. मेहता विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी महायुतीचे (शिंदेसेना) उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, श्वेता महाले यांच्यासह महायुतीच्या विविध घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना शिंदे यांनी, उद्धव ठाकरे खामगावातील सभेत जे बोलले ते कुणालाच कळले नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते. त्यातच त्यांच्या आघाडीत सहभागी असलेल्यांचे सध्या गळ्यात गळे असले तरी ते पायात पाय टाकून एकमेकांना पाडणार असल्याचे सांगितले.

कातडे पांघरूण कोणीही वाघ होऊ शकत नाही. असली आणि नकली वाघातील फरक जनतेला चांगला माहिती आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, त्यामुळेच त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन केल्याचेही ते म्हणाले. आमच्या सरकारच्या काळातील कामाचे विचारतात, त्यांनी आरसा पाहिल्यास त्यांना त्यांच्या कामाची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही, असेही शिंदे म्हणाले. 

देशात महायुतीच सक्षम पर्याय - फडणवीस

सद्य:स्थितीत देशातील जनतेपुढे दोनच पर्याय आहेत. त्यामध्ये सक्षम महायुती तर दुसरीकडे प्रचंड गोंधळ असलेली महाआघाडी आहे. मोदी यांच्या नेतृत्वात विविध पक्ष एकसंघपणे एका इंजिनला जोडलेले डबे आहेत. तर महाआघाडीत प्रत्येक पक्षच इंजिन असल्याने त्यांची दिशा वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांची गाडी धावतच नाही, जागेवरच राहणार आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाचा वाटा देण्यास तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी नकार दिला. त्यामुळे ते काम रखडले होते. त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे काम आमच्या सरकारने केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केले...

बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार नसल्याने त्यातून बाहेर पडत सरकार स्थापन करण्याचे ऑपरेशन केले. आपण डाॅक्टर नसलो तरी अशी अनेक ऑपरेशन फत्ते केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

बाप नंबरी, बेटा दस नंबरी...

उबाठा सेनेत सध्या काय चालू आहे, कुणाचेच कुणाला कळत नाही. ती सेना दोघा बापलेकांची आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांना स्थान नाही. त्यातही दोघांची प्रवृत्ती म्हणजे, बाप नंबरी, बेटा दस नंबरी असल्याचा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkhamgaonखामगाव