शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ग्रामस्थांचा गटविकास अधिका-यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 23:54 IST

संग्रामपूर गावात आर.ओ प्लांट बसविण्याची मागणी.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : गावातील विविध समस्यांसाठी संग्रामपूर तालुक्यातील झाशी येथील नागरिकांनी सोमवारी दुपारी गटविकास अधिकार्‍यांना घेराव घातला. गावातील समस्यांकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावेळी ग्रामस्थांनी कमालीचा संताप व्यक्त केला. तालुक्यातील झाशी या गावाचा समावेश धामणगाव गोतमारे या ग्रामपंचायतीत होतो. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. दरम्यान, गावात पिण्याच्या पाण्याकरिता हापशी तसेच ग्रामपंचायतने अधिग्रहीत केलेले बोअरवेल आहे. परंतु यामध्ये क्षारयुक्त पाणी पुरवठा गावात होते व त्यामुळे गावातील बरेच नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. मागील महिन्यात किडनीच्या आजाराने गावातील ४ लोकांचा मृत्यू झाला असून सद्यास्थितीतही बरेच किडनीचे रुग्ण आहेत. त्यामुळे गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, यासह गावातील विविध समस्या सोडविण्यात याव्यात,याबाबत ग्रामस्थांच्यावतीने वारंवार पाठ पुरावा करण्यात आला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकरी बचाओ आंदोलन समितीच्यावतीने बीडीओंना घेराव घालण्यात आला. यामध्ये तालुका संघटक केशव घाटे, माजी सरपंच पुंजाजी जानराव जळमकार, सुनंदा पुंजाजी जळमकार, ग्रा.पं.सदस्या, वसंत नामदेव जळमकार, विलास देविदास चव्हाण, यांच्यासह गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी पं.स.गट विकास अधिकारी डॉ.हिरोळे, पं.स.सदस्य लोकेश राठी, विस्तार अधिकारी भिलावेकर, आरोग्य विस्तार अधिकारी राठोड यांनी नागरिकांच्या समस्यांचे समाधान केले. यावेळी गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठाच्या अधिकार्‍यांनी गावात येवून पाहणी करुन योग्य ती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही गटविकास अधिकार्‍यांना सादर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार बी.आर.गिते यांनी प्रशासकीय कार्यालयात उपस्थिती लावली होती.