शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहर प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:24 IST

लोणार:  जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्‍याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत  कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती  उपक्रम स्वातंत्र्यदिनी करण्याचा निर्धार केला असून, शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोणार नगरपालिकेचा पुढाकार स्वातंत्र्यदिनी राबविणार उपक्रम

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार:  जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्‍याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत  कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती  उपक्रम स्वातंत्र्यदिनी करण्याचा निर्धार केला असून, शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे.जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर शहराला भेडसावणारा एक भेसूर चेहरा म्हणजे शहरात फोफावणारा प्लास्टिक कचरा आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील जवळपास सर्वच प्रकारच्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. रोज जमा होणार्‍या या लाखो प्लास्टिक पिशव्या कचर्‍यात जाऊन भटक्या प्राण्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. याबाबत  लोणार नगर परिषदेने वेळोवेळी प्लास्टिक पिशवी बंदीबाबत पत्रे पाठवून माहिती दिली तसेच  त्याबाबत पोस्टर्स लावले असले, तरी विक्रेत्यांच्या अंमलबजीवणीचा अभाव व  ग्राहकांची मागणी व सोय पाहता विक्रेत्यांनी  प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवला असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. त्यामुळे फक्त भौतिक सुख-सोयी निर्माण होतील; पण शहराच्या सौंदर्याला व आरोग्याला धोकादायक ठरणार्‍या प्लास्टिकमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार व स्वच्छ भारत कसा होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कापडी पिशव्यांचा वापर अनिवार्य केला असताना त्या वापरासाठी कोणीही पाहिजे तितका धजावत नाही. जो तो प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य, वस्तू नेण्यालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला प्लास्टिक प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.  प्लास्टिक पिशव्या अविघटनशील असल्यामुळे जनावरांच्या पोटात गेल्यास रवंथ प्रक्रियेत व पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पचनक्रियेचे आजार होतात. पिशव्या पोटातील अन्नाला चिटकून राहिल्याने अन्नाचे पचन होत नाही, अशा जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने प्लास्टिक पिशव्या वापराचे निकष व नियम ठरवून दिले आहेत. तरीही शहरातील हातगाड्या व दुकानांमध्ये ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत आहे.

कायदा फक्त नावापुरता?पर्यावरणाला धोका असल्याने शासनाने कॅरिबॅग वापरावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यासाठी कायदाही केला; पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. प्लास्टिक कॅरिबॅगमुळे आरोग्याला धोका, पावसाळ्यात तुंबणारी गटारे यांची नेहमी चर्चा असते; पण यासाठीचा कायदा करण्यापलीकडे शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. लाल, पिवळ्या व काळ्या रंगातील प्लास्टिक कॅरिबॅग विक्री व्यवसाय शहरामध्ये चांगलाच फोफावला आहे. 

कापडी पिशव्यांचा अपूर्ण पुरवठाग्राहकांना वस्तू विक्री केल्यास कॅरिबॅग द्यावीच लागते. त्याला पर्याय म्हणून कागदी अथवा कापडी पिशव्यांचा बाजारपेठेत अपूर्ण पुरवठा असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे भाजीविक्रेता, फळविक्रेता यांच्याकडून सर्रास प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर होताना दिसतो.

यूज अँण्ड थ्रोची क्रेझ कौटुंबिक सोहळ्यातही यूज अँण्ड थ्रो म्हणून येणार्‍या प्लास्टिकचे ग्लास, कप, वाटी, ताट, चमचे याचा वापर वाढला आहे. त्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आरोग्यासाठी हानिकारक असून, ते कर्करोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरणारे असते.