शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अघाेषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, ...

मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, अशा परिस्थितीत होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याचवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. मे महिना असल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरीच थांबणे पसंत करतात. टीव्हीवरील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत नागरिक वेळ घालवत आहेत. असे असताना महामहावितरण कंपनीकडून मागील पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात अवेळी वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

वास्तविक पाहता महावितरण कंपनीकडून भारनियमनापूर्वी वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक असते. मात्र, कुठलेच कारण नसताना दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित करून अवेळी भारनियमन केले जात आहे. अनेकवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन ते चार दिवसांत वातावरणात थोडा तरी बदल जाणवला किंवा पाण्याचे दोन-चार थेंब जरी पडले, तरी वीज पुरवठा बंद केला जात आहे. महावितरण कंपनीने उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा तसेच कडक निर्बंधांचा विचार करून भारनियमन बंद करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.