शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अघाेषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, ...

मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, अशा परिस्थितीत होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याचवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. मे महिना असल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरीच थांबणे पसंत करतात. टीव्हीवरील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत नागरिक वेळ घालवत आहेत. असे असताना महामहावितरण कंपनीकडून मागील पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात अवेळी वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

वास्तविक पाहता महावितरण कंपनीकडून भारनियमनापूर्वी वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक असते. मात्र, कुठलेच कारण नसताना दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित करून अवेळी भारनियमन केले जात आहे. अनेकवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन ते चार दिवसांत वातावरणात थोडा तरी बदल जाणवला किंवा पाण्याचे दोन-चार थेंब जरी पडले, तरी वीज पुरवठा बंद केला जात आहे. महावितरण कंपनीने उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा तसेच कडक निर्बंधांचा विचार करून भारनियमन बंद करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.