शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अघाेषित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, ...

मेहकर : कुठलीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनीकडून शहरांमध्ये अवेळी भारनियमन केले जाते. अगोदरच उन्हाळा, त्यात संचारबंदी, अशा परिस्थितीत होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याचवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे. मे महिना असल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरीच थांबणे पसंत करतात. टीव्हीवरील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत नागरिक वेळ घालवत आहेत. असे असताना महामहावितरण कंपनीकडून मागील पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात अवेळी वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

वास्तविक पाहता महावितरण कंपनीकडून भारनियमनापूर्वी वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक असते. मात्र, कुठलेच कारण नसताना दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित करून अवेळी भारनियमन केले जात आहे. अनेकवेळा मध्यरात्रीनंतर खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील तीन ते चार दिवसांत वातावरणात थोडा तरी बदल जाणवला किंवा पाण्याचे दोन-चार थेंब जरी पडले, तरी वीज पुरवठा बंद केला जात आहे. महावितरण कंपनीने उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा तसेच कडक निर्बंधांचा विचार करून भारनियमन बंद करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.