शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम; अभ्यासाचाच पडला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या ...

शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसऱ्या वर्गापासूनच मुलांना उजळणी मुखोद्गत होऊ लागली; परंतु आता शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जाऊ लागले आहे. इयत्ता पाचवीच्या मुलांना भागाकार व गुणाकार कसा करायचा, याचा विसर पडला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात शाळेकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले; परंतु कोणत्याही विषयाच्या पुस्तकाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदा कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, हेसुद्धा माहीत नाही.

पालकांनी घरातच घ्यावी शाळा...

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइनचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांची अक्षर ओळख होण्यासाठी पालकांनी पाल्यांकडून नियमित काही पाने शुद्धलेखनाचा सराव करून घेणे आवश्यक आहे.

केवळ ऑनलाइनच्या भरवशावर न राहता स्वत: पाल्यांच्या दैनंदिन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, घरातच काळजी घेऊन मूल्यांकन करणेही गरजेचे आहे.

मुलांना अक्षरओळख होईना!

दीड वर्षापासून केवळ मोबाइलचा उपयोग करून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर बिघडत आहे.

लिहिण्याची गती मंदावली असून, अक्षरओळखही कठीण झाली आहे. पालकवर्गही लक्ष द्यायला तयार नाही.

पहिली - दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाचा फारसा परिणाम दिसत नाही.

अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक

कोरोना काळात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. मोबाइल आणि टीव्हीच्या सभोवताल त्यांचा दिवस राहतो.

ऑनलाइन शिक्षणात फारसा रस नसल्याने अनेकांचे मन एकाग्र राहत नाही. यामुळे अभ्यास करण्याची इच्छा नसते.

यामुळे चिमुकले अभ्यास टाळण्यासाठी विविध कारणे सांगत आहेत. त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

वारंवार सांगूनही अनेकांचे पाल्य ऐकत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याचे विविध परिणामही समोर येत आहेत.

चिमुकल्यांना दैनंदिन अभ्यासाचा विसर पडत चालला आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालकांची अडचण वेगळीच

शाळेमध्ये गेल्यानंतर दिवसभर मुले व्यस्त राहत होती. त्यानंतर घरी अभ्यास व नंतर शिकवणी वर्गात जात होते. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांच्याच हाती मोबाइल असतो. क्लासनंतर मोबाइलमध्ये गेम, कार्टून पाहणे यात जास्त वेळ जात आहे.

- संजय केशवराव देशमुख.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हसत - खेळत होणारे शिक्षण बंद झाले. ऑनलाइनमुळे अडचणी वाढल्या आहेत. केवळ मोबाइलच्या भोवती शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अभ्यासातही मन लागत नसल्याचे दिसून येत आहे.

- भगवान मनोहर कंकाळ.