शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

काेराेना काळात मुलांचे वजन वाढले, स्थुलतेमुळे पालक वर्ग चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST

बुलडाणा : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतरही शाळा सुरू झालेल्या नाहीत. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. यात मुलांच्या शारीरिक ...

बुलडाणा : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतरही शाळा सुरू झालेल्या नाहीत. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. यात मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे सतत मोबाईल आणि दिवसभर टीव्हीमुळे मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. बैठ्या जागेवर सतत काही ना काही खात राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यात अतिपोषण ही समस्या झाली आहे.

मुलांचे वजन वाढले आहे. मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे पालक वर्ग चिंतीत आहे. दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य संस्थेने वर्तविली असून, ती लहान मुलांसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात असल्याने मुलांना आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने बाहेर पडू नये, ही भीती कायमची सतावत आहे. ग्रामीण भागात मात्र, मुलांमध्ये कुपाेषणाचे प्रमाण असल्याचे दिसत आहे़

शहरांमध्ये स्थूलता ही नवी समस्या

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मुलांना घराबाहेर पडता येत नाही. यात त्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. एकसारखे मोबाईलसमोर वा टीव्हीसमोर बसून राहावे लागत मुलांचे वजन वाढले आहे. १५ ते १८ किलो वजनाच्या मुलांचे वजन ४०ते ४२ किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्यात लठ्ठपणा जाणवायला लागला आहे. यातून स्थूलता ही नवी समस्या शहरात उभी ठाकली आहे.

स्थूलतेची कारणे काय?

एकाच ठिंकाणी बसून राहणे.

शारीरिक हालचाली नसणे.

सतत टीव्ही पाहणे आणि माेबाईलचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणे.

जंकफूडचे जास्तीत जास्त सेवन करणे.

सतत काही ना काही खात राहणे.

पालकांची चिंता वाढली

शाळा बंद असल्यामुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. याचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होत आहे. सतत ऑनलाईन क्लास करीत असल्यापुळे पुलांची स्थूलता वाढली आहे़

सुभाष अढाव, पालक

गत वर्षांपासून शाळा बंदच असल्याने मुले घरातच असतात़ तसेच ऑनलाईन शाळेमुळे माेबाईल, टॅबवरच त्यांचा वेळ जात आहे़ दुसरीकडे घरीच असल्याने सतत जंक फूड व इतर सेवण करणे सुरूच असल्याने मुलांचे वजन वाढत आहे़

गजानन आखाडे, पालक

तज्ज्ञ काय म्हणतात

कोरोना काळात फिजिकल ॲक्टिव्हिटी थांबल्या आहेत. जंक फूडचे अधिक सेवन यामुळे मुलांचे वजन वाढते़ त्यात लहान मुलांचे वजन ४० ते ४५ किलोंपर्यंत गेले आहे. स्थूलता ही समस्या निर्माण झाली आहे.

- डॉ. नकुल फुले. बालरोगतज्ज्ञ डोणगांव

कोविडमध्ये शाळा बंद राहिल्याने मुलांच्या आहार आणि शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम झाला. लॉकडाऊनपूर्वी नोंदविलेल्या वर्तनांच्या तुलनेत कोविड काळात मुलांनी रोज जास्त पौष्टिक व अतिरिक्त जेवणाने स्थूलता वाढली.

-डॉ. गजानन उल्हेमाले, बालरोगतज्ज्ञ तथा आयुर्वेद तज्ज्ञ