शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चिखलीत नगरसेवकांच्या जेवणावळीला बंडखोरीचा ‘ठसका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:41 IST

चिखली : चिखली नगरपालिकेमध्ये एका तपानंतर भाजपाला एकहाती सत्ता देऊन चिखलीकरांनी शहराच्या विकासाचं एक देखणं स्वप्न पाहिलं, त्याला कारणही तसंच होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान चिखली शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द जनतेला दिला होता. या शब्दाखातर भाजपाच्या पदरात जनतेने भरभरून मतांचा जोगवा टाकला; मात्र भाजपाला मिळालेलं हे एकहाती यश अंतर्गत गटबाजीमुळे पचनी पडत नसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देनगरपालिकेत भाजपाची बंडाळीभाजपला आश्‍वासनांचा विसर 

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली नगरपालिकेमध्ये एका तपानंतर भाजपाला एकहाती सत्ता देऊन चिखलीकरांनी शहराच्या विकासाचं एक देखणं स्वप्न पाहिलं, त्याला कारणही तसंच होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान चिखली शहराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्द जनतेला दिला होता. या शब्दाखातर भाजपाच्या पदरात जनतेने भरभरून मतांचा जोगवा टाकला; मात्र भाजपाला मिळालेलं हे एकहाती यश अंतर्गत गटबाजीमुळे पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. त्याचे प्रत्यंतर कालपरवाकडे नगरसेवकांना दिलेल्या एका जेवणावळीतून दिसून आले. पालिकेतील झाडून सार्‍या नगरसेवकांना या जेवणावळीमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. केवळ नगराध्यक्षांना पद्धतशिरपणे डावलून ही जेवणावळी औद्योगिक परिसरात पार पडल्याने या जेवणावळीस विशेष महत्त्व प्राप्त झाले; मात्र या जेवणावळीच्या आडून नगरसेवकांना बंडखोरीचे बळ दिल्या गेल्याची चर्चा होत असल्याने या जेवणावळीचा ठसका जिल्हाभरातील भाजपा परिवारास लागला आहे.त्याचे झाले असे की, चिखलीत प्रिया कुणाल बोंद्रे यांना नगराध्यक्षपदी बसवून चिखलीत एक नवे सत्ताकेंद्र निर्माण केल्या गेले. हे होत असताना कुणाल बोंद्रेंच्या रूपाने नवे युवा नेतृत्वदेखील भाजपाच्या हाती लागले. जुन्या जाणत्या निष्ठावान भाजपायींना जरी ही बाब नवखी होती तरी त्याला कमळाचा सुगंध असल्याने त्यांनी या युवा नेतृत्वाचा स्वीकार केला; मात्र ही बाब भाजपाच्या नेत्यांना पचनी पडण्यास जड जात असल्याने या-ना-त्या कारणावरून खुसपट काढून अडचणी वाढविण्याचे काम भाजपातील गटबाजी करीत असते. या ठिकाणी कुणाल ऐवजी दुसरा अजून कोणी असता, तर त्याच्यासोबतदेखील हेच घडले असते, हा भाग अलहिदा. भाजपामध्ये उघड-उघड काहीच चालत नाही. तेथे सगळे बंदद्वार अथवा अंधारातच चिंतन बैठकीद्वारे चालते. भाजपाचे हे सूत्र नव्याने भाजपामध्ये आलेल्या अनेक नेत्यांना उमजलेले नाही. त्याचा परिपाक कालपरवाकडे येथील औद्योगिक वसाहतीत रात्री अंधारात झालेल्या मसालेदार जेवणावळीवरून दिसून आले. सेक्सपियरने असे म्हटले आहे की, नावात काय आहे? परंतु राजकारणात नावात आणि फोटोत बरेच काही असते. त्या रात्री झालेल्या जेवणावळीच्या पाठीमागेदेखील अशाच नावाची आणि फोटोची किनार आहे. चिखली पालिकेच्या कार्यक्रमांमध्ये सन्मानजनक ठिकाणी (प्रोटोकॉलनुसार) नाव व फोटो टाकल्या जात नसल्याने या जेवणावळीचे प्रायोजकत्व एका गटाच्या गळी उतरविण्यात आले असले, तरी या जेवणावळीलादेखील अनेक कंगोरे आहेत. पालिकेत अनेक कर्मचारी आमचे ऐकत नाहीत, आमच्या वार्डात कामे होत नाहीत, ते काम करीत असताना आम्हाला विश्‍वासात घेतल्या जात नाही, मर्जीतला कंत्राटदार दिला जात नाही, असे नानाविध कारणे आहेत. या कारणांवरून नगरसेवकांमध्ये संकलीत असलेला असंतोष जेवणावळीच्या रूपाने कॅश करण्याचा प्रयत्न केल्या गेला. जेवणावळीला अपवादात्मक सोडले तर झाडून सारे नगरसेवक (काही विरोधी पक्षातील छुप्या मार्गाने) सहभागी होते.  या जेवणावळीमधून केवळ नगराध्यक्षांनाच डावलल्या गेल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या जेवणावळीमुळे प्रायोजकांपेक्षा इतरांनीच कसे उट्टे काढले, अशा फुशारक्या मारण्यात समाधान मानले. हे सारे घडत असताना जेवणावळीतील इतवृत्तांत नगराध्यक्षांना ‘लाइव्ह’ ऐकविण्यातदेखील अनेक जण अग्रेसर होते. त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंगच थेट पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, कोअर कमिटी सदस्य आमदार डॉ.संजय कुटे आणि जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांना नगराध्यक्षांनी ऐकविल्याने त्याची दखल घेऊन भाऊसाहेबांनी २२ सप्टेंबर रोजी नगरसेवकांची तातडीची बैठक चिखलीत बोलाविली असल्याचे समजते, तर जिल्हाध्यक्षांनीदेखील त्वरेने भ्रमणध्वनीवरून काही महत्त्वाच्या नगरसेवकांशी चर्चादेखील केली असल्याचे कळते. आता या बैठकीतून काय बाहेर येणार, हे येणारा काळच ठरवेल. हे सारे जरी खरे असले तरी हे भाजपाच्या पक्षशिस्तीत बसत नाही. नगराध्यक्ष जर नगरसेवकांची कामे करत नसतील तर पक्षo्रेष्ठींकडे ही बाब मांडल्या जाऊ शकत होती; मात्र तसे न घडता ती बाब औद्योगिक वसाहतीमध्ये चर्चिल्या गेल्याने पक्षo्रेष्ठी कमालीचे संतप्त झाले असून, ‘वेळ’ आल्यावर यासंदर्भात संबंधिताना पक्षशिस्तीचे धडे द्यावे लागतील, असे सांगून नगराध्यक्षांना धीर देण्याचा प्रयत्नही झाला असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे, तर प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या दरबारातही हे वृत्त पोहोचविण्यात नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे कमी पडल्या नाहीत. 

भाजपला आश्‍वासनांचा विसर चिखलीकरांनी मोठय़ा विश्‍वासाने भाजपाच्या हाती सत्ता सोपविली आहे; मात्र सत्ता मिळाल्यानंतर भाजपाने शहरवासीयांना दिलेल्या आश्‍वासनांचा पुरता विसर पडल्याचे आज रोजी दिसून येत आहे. पालिकेत सत्तास्थापनेनंतर अद्यापही शहराच्या विकासात भरीव व दखलपात्र असे कोणतेही काम झालेले नाही. रस्ते, स्वच्छता, पाणी हे मूलभूत प्रश्न पूर्वीपेक्षा अधिक बिकट होत आहेत. ‘‘प्रमुख रस्त्यांवरील खड्डे पाहून जनता आम्हाला शिव्या घालत आहे’’, असे दस्तुरखुद्द सत्ताधारी नगरसेवकच बोलू लागले आहे. अशी एकूण परिस्थिती असताना सत्ताधार्‍यांमध्ये अंतर्गत गटबाजीला आलेले उधान पाहता, शहराला ‘अच्छे दिन’ येणार कधी? हा सवाल मात्र अनुत्तरीतच आहे.