शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

डफडे मोर्चाने दणाणली चिखली नगर पालिका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

चिखली : येथील डी. पी. रोडवरील दुकानांसमोर असलेले अस्थाई अतिक्रमण हटवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करत वेळोवेळी निवेदने देऊनही पालिका ...

चिखली : येथील डी. पी. रोडवरील दुकानांसमोर असलेले अस्थाई अतिक्रमण हटवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करत वेळोवेळी निवेदने देऊनही पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करत न. प. प्रशासनाला जागे करण्यासाठी डी. पी. रोड व्यापारी संघटनेच्यावतीने १० ऑगस्टला ‘डफडे बजाओ’ आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे न. प. परिसर दणाणून गेला होता.

चिखली शहरातील प्रमुख मार्ग असलेला व पोलीस स्टेशन, नगरपालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय अशा महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांना जोडणारा डी.पी.रोड हा एक महत्त्वाचा रस्ता आहे़ या रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे रहदारीस त्रास होतो़ शिवाय व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने मागील दोन वर्षांपासून हे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापारी संघटनेद्वारा वारंवार निवेदने देण्यात येत आहेत. मात्र या निवेदनांचा न. प. प्रशासनावर काहीच परिणाम न झाल्याने अखेरीस व्यापाऱ्यांनी न. प. प्रशासनाच्या विरोधात १० ऑगस्टला डफडे बजाओ आंदोलन पुकारले. स्थानिक डी. पी. रोडवरून सुरुवात झालेला हा मोर्चा बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, राजा टॉवरमार्गे नगरपालिकेवर धडकला. यावेळी जोरदारपणे डफडे वाजविल्याने पालिका आवार दणाणून निघाला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपले निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. डी. पी. रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा यांनी पालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचा कर देऊन पालिका प्रशासन आमच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाईलाजाने कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ‘डफडे बजाओ’ आंदोलन करण्यात आले, यानंतरही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला तर माजी नगरसेवक नीलेश अंजनकर यांनीदेखील पालिकेच्या कारभारावर रोष व्यक्त केला. या मोर्चामध्ये डी. पी. रोड व पारधी बाबा रोडवरील सर्व व्यावसायिक आपापली दुकाने बंद ठेवून सहभागी झाले होत.

कारवाईस सभागृहाचा विरोध !

व्यापाऱ्यांच्या अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचा ठराव सर्वसाधारण बैठकीमध्ये घेण्यात आल्यानंतर एकाही नगरसेवकाने त्याची बाजू घेतलेली नाही. पर्यायाने सभागृहाच्या निर्णयाविरोधात जाऊन पालिका प्रशासनास कारवाई शक्य नसल्याचा निर्वाळा आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.