शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

चिखली महावितरण उपविभागाचे हाेणार विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:24 IST

चिखली : चिखली महावितरण उपविभागाचे विभाजन करून तालुक्यातील उंद्री येथे नवीन उपविभागाची निर्मिती करावी, तसेच चिखली शहर भाग १ ...

चिखली : चिखली महावितरण उपविभागाचे विभाजन करून तालुक्यातील उंद्री येथे नवीन उपविभागाची निर्मिती करावी, तसेच चिखली शहर भाग १ व शहर भाग २ आणि चिखली ग्रामीण भाग २ या वितरण केंद्राचे विभाजन करून पेठ येथे नवीन वितरण केंद्राची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांनी दिले आहेत. माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मागणीची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत.

चिखली उपविभागात सद्यस्थितीत ११२ गावे जोडलेली असून, ग्राहक संख्या ७८ हजार ६४४ आहे, तर १२ उपकेंद्र असून, विस्तारित विद्युत वाहिन्या व रोहित्र मोठया संख्येने आहेत. त्याचप्रमाणे भौगोलिक स्थिती पाहता चिखली उपविभागाअंतर्गत कृषी प्रभावित व सिंचन क्षमता जास्त प्रमाणात आहे. खेडयांचा विस्तार सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतराचा आहे. नवीन विभाजनामुळे खेड्यांची संख्या कमी होऊन वीज ग्राहकांना वेळेत सुविधा पुरविणे, नवीन वीज कनेक्शन त्वरित देणे, वीज गळती कमी करणे, वीज चोरीचे प्रमाण कमी होऊन कंपनीच्या महसुलात वाढ होणे शक्य असल्याने तालुक्यातील उंद्री येथे उपविभागाची निर्मिती तत्काळ करण्यात यावी, तसेच म्हसला बु. येथील विद्युत उपकेंद्र फेज २ मधून १ मध्ये वर्ग करून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी बाेंद्रे यांनी केली हाेती.

११२ गावांसाठी ११ उपकेंद्र

चिखली येथील उपविभागात सद्यस्थिीतीत एकूण ६ उपकेंद्र आहेत. गावांची संख्या ११२ व उपकेंद्रांची संख्या ११ आहे. आशा स्थितीत ग्राहकांना वीज वितरणची योग्य वेळी जास्त सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळे चिखली उपविभागात असलेले वीज वितरण केंद्राचे भौगोलिकदृष्टया तसेच ग्राहक संख्या पाहता मोठ्या वितरण केंद्राचे नवीन वितरण केंद्र निर्माण करणे आवश्यक असल्याचे बाेंद्रे यांनी निवेदनात म्हटले हाेते.

पेठ वितरण केंद्र स्थापन हाेणार

चिखली येथील चिखली शहर १ व चिखली शहर २ आणि चिखली ग्रामीण २ या वितरण केद्रांचे विभाजन करून तालुक्यातील पेठ या वितरण केंद्राची नव्याने निर्मिती करावी. तसेच शहरी व ग्रामीण नागरिकांच्या विजेच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी राहुल बोंद्रे यांनी ना. राऊत यांची भेट घेऊन व निवेदनाव्दारे केली हाेती. दरम्यान या मागणीची तातडीने दखल घेत ना. राऊत यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहे. यावेळी बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसंडी, धाड सरपंच रिजवान सौदागर यांची उपस्थिती होती.