शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

निराधारांच्या मदतीचे धनादेश केले परत!

By admin | Updated: September 20, 2016 00:21 IST

चिखली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाचा प्रताप.

चिखली(जि. बुलडाणा), दि. १९ : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅँकेचे व्यवस्थापक पुन्हा एकदा आपल्या आडमुठेपणामुळे चर्चेत आले असून, यावेळी केलेल्या प्रतापामुळे तहसीलमार्फत आलेल्या निराधारांच्या मदतीचे धनादेश वेळेवर वटविल्या गेले नाहीत. परिणामी, त्याचा फटका लाभार्थ्यांना बसला असून, संजय गांधी निराधार योजनेतील वृद्ध महिला, पुरुष यांना नाहक बँकेचा उंबरठा झिझवावा लागत आहे.विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे नाव फेब्रुवारी २0१३ मध्ये बदलून विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक, असे झाले आहे. या बँकेकडे असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भाने तहसील विभाग गेल्या अनेक वर्षांपासून व्यवहार करत असून, बँकेचे नाव बदलले असतानाही यापूर्वी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक या नावानेच तहसील विभाग व्यवहार करत आहे. त्यानुसार तहसीलच्या संजय गांधी निराधार विभागाच्या शिपाई महिला ५५५ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी २ लाख ६२ हजार २00 रुपयांचे एकूण तीन धनादेश घेऊन गेल्या होत्या; मात्र ऐनवेळी बँकेचे व्यवस्थापक बोराडकर यांनी बँकेत चेक घेऊन आलेल्या महिलेला चेक परत करून तुमच्या यादीतील नावे व बँकेचे नाव चुकीचे आहे. आम्हाला कॉम्प्युटरमधील नावाचा डाटा पेनड्राईव्हमध्ये भरून द्या, चूक झाली तर तहसील जबाबदार राहील, असे सुनावले. बँक व्यवस्थापकाच्या या निर्णयामुळे योजनेतील वृद्ध महिला, पुरुष यांची कुचंबना झाली असून, अनुदानासाठी बँकेचा उंबरठा झिझविणार्‍या इसरूळ, मंगरूळ, अमोना, शेळगाव आटोळ, कोनड, पिंपळवाडी, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, तेल्हारा, एकलारा येथील लाभार्थ्यांना ऐन सणासुदीच्या काळात वेळेवर पैसे न मिळाल्याने उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत तालुक्यातील इसरूळ, मंगरूळ, अमोना, शेळगाव आटोळ, कोनड, पिंपळवाडी, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, तेल्हारा, एकलारा या गावातील निराधार योजनेचे सुमारे ५५५ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात येते. त्यानुषंगाने तहसीलमार्फत चेक क्रमांक ४२६६५३ द्वारे २७८ लाभार्थ्यांचे १ लाख ४३ हजार २00, चेक क्र.४२६८५५ द्वारे १५९ लाभार्थ्यांचे ९५ हजार ४00 आणि चेक क्र.५४७४६६ द्वारे ११८ लाभार्थ्यांंचे २३ हजार ६00 रुपये असे एकूण २ लाख ६३ हजार २00 रुपयांचे तीन चेक बँकेच्या व्यवस्थापकाने परत केल्याने निराधारांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम घेण्यासाठी चिखली येथे ये-जा करण्यासाठी एका वेळेला ५0 ते ७0 रुपयांचा खर्च होतो, हे विशेष.