शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: October 23, 2014 00:13 IST

विधानसभेसाठी उमेदवारी प्राप्त न होऊ शकलेल्या नेत्यांची विधान परिषदेची वाट बिकट.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ही नाराजी दूर करण्यासाठी या नेत्यांना पक्षाचे काम करा, तुमचा विधान परिषदेसाठी विचार करू, असा सल्ला व आश्‍वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. मात्र निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांना मिळालेले यश लक्षात घेता असे आश्‍वासन पूर्ण करणे पक्षप्रमुखांना शक्य दिसत नाही. त्यामुळे विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेस ४२, राष्ट्रवादी ४१ व शिवसेना ६३ जागा जिंकली. ही संख्या पाहता विधानपरिषदेवर या पक्षांपैकी प्रत्येकी १ किंवा २ एवढेच सदस्य जाऊ शकतात. निकालामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे त्यांना राजकीय पुनजिर्वन देण्यासाठी विधानपरिषदेचा विचार केला जाईल व त्यांनाच प्राधान्य मिळेल. त्यामुळे विविध मतदारसंघात एमएलसीसाठी शब्द घेणार्‍या नेत्यांना आता विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानसभेतील किमान ३0 जागांमागे एक विधानपरिषदेचा आमदार असे साधारणपणे सूत्र असते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्याही अनेक नेत्यांना विश्रांती घेण्याशिवाय पर्याय नाही. *घटकपक्षांची गोचीमहायुतीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपाइं आठवले गट या पक्षाच्या नेत्यांना विधानपरिषदेचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र या दोन्ही पक्षांची विधानसभेतील एकूण कामगिरी लक्षात घेता या पक्षांनाही विधानपरिषदेवर घेतल्या जाण्याची शक्यता नाही.*आचारसंहिता संपलीविधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने लावलेली आचारसंहिता २२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी संपली. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर निर्णय घेण्यासाठी आता मोकळीक मिळाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दुसर्‍याच दिवशी राजकीय पदाधिकार्‍यांना त्यांची वाहने परत देण्यात आली.