शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरातील ओझे कमी करण्याचे आव्हान

By admin | Updated: June 13, 2016 01:49 IST

लगबग सुरू : २७ जून रोजी वाजणार शाळेची पहिली घंटा!

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी २७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर पुन्हा बालकांच्या पाठीवरील ओझे वाहण्याच्या नियमित प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बालकांच्या पाठीवरील हे ओझे कमी व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले, तशा सूचना संबंधित शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र हे ओझे अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांसमोर आता दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शैक्षणिक वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी शाळा या बाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हय़ात लवकरच शाळांना सुरुवात होत आहे. पहिलीतील मुलांच्या दप्तराचे ओझे दोन किलो आणि आठवीतील मुलांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाच्या समितीने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. असे असले तरीही शाळेच्यावतीने कोणतेही नियोजन होत नसल्याने दरवर्षी हे ओझे बालकांना वाहावे लागत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशापेक्षा दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट वजन बालकांच्या पाठीवर आढळून येते. परिणामी कोवळ्या वयाच्या बालकांच्या पाठीच्या कण्यावर ताण पडत आहे. प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे, यासारखे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १0 टक्के वजन दप्तराचे असावे, असे शासकीय अहवालात सुचवले आहे. शाळा सुरू होण्यापासूनच याची योग्य अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मदत मिळेल. वह्या-पुस्तकांच्या वजनाचा परिणाम साधारणपणे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अधिक पडतो. शाळांनी या बाबत लवकरच निर्णय घेतला तर विद्यार्थीच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे आता शाळांसमोर शैक्षणिक सत्र प्रारंभ होण्यापूर्वी हे ओझे कमी कसे करता येईल, हा निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून शाळा कोणता मार्ग निवडतात, याकडे पालकांचे लक्ष आहे.