शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

दप्तरातील ओझे कमी करण्याचे आव्हान

By admin | Updated: June 13, 2016 01:49 IST

लगबग सुरू : २७ जून रोजी वाजणार शाळेची पहिली घंटा!

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी २७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर पुन्हा बालकांच्या पाठीवरील ओझे वाहण्याच्या नियमित प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बालकांच्या पाठीवरील हे ओझे कमी व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले, तशा सूचना संबंधित शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र हे ओझे अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांसमोर आता दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शैक्षणिक वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी शाळा या बाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हय़ात लवकरच शाळांना सुरुवात होत आहे. पहिलीतील मुलांच्या दप्तराचे ओझे दोन किलो आणि आठवीतील मुलांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाच्या समितीने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. असे असले तरीही शाळेच्यावतीने कोणतेही नियोजन होत नसल्याने दरवर्षी हे ओझे बालकांना वाहावे लागत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशापेक्षा दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट वजन बालकांच्या पाठीवर आढळून येते. परिणामी कोवळ्या वयाच्या बालकांच्या पाठीच्या कण्यावर ताण पडत आहे. प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे, यासारखे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १0 टक्के वजन दप्तराचे असावे, असे शासकीय अहवालात सुचवले आहे. शाळा सुरू होण्यापासूनच याची योग्य अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मदत मिळेल. वह्या-पुस्तकांच्या वजनाचा परिणाम साधारणपणे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अधिक पडतो. शाळांनी या बाबत लवकरच निर्णय घेतला तर विद्यार्थीच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे आता शाळांसमोर शैक्षणिक सत्र प्रारंभ होण्यापूर्वी हे ओझे कमी कसे करता येईल, हा निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून शाळा कोणता मार्ग निवडतात, याकडे पालकांचे लक्ष आहे.