शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

दप्तरातील ओझे कमी करण्याचे आव्हान

By admin | Updated: June 13, 2016 01:49 IST

लगबग सुरू : २७ जून रोजी वाजणार शाळेची पहिली घंटा!

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी २७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर पुन्हा बालकांच्या पाठीवरील ओझे वाहण्याच्या नियमित प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बालकांच्या पाठीवरील हे ओझे कमी व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले, तशा सूचना संबंधित शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र हे ओझे अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांसमोर आता दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शैक्षणिक वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी शाळा या बाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हय़ात लवकरच शाळांना सुरुवात होत आहे. पहिलीतील मुलांच्या दप्तराचे ओझे दोन किलो आणि आठवीतील मुलांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाच्या समितीने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. असे असले तरीही शाळेच्यावतीने कोणतेही नियोजन होत नसल्याने दरवर्षी हे ओझे बालकांना वाहावे लागत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशापेक्षा दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट वजन बालकांच्या पाठीवर आढळून येते. परिणामी कोवळ्या वयाच्या बालकांच्या पाठीच्या कण्यावर ताण पडत आहे. प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे, यासारखे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १0 टक्के वजन दप्तराचे असावे, असे शासकीय अहवालात सुचवले आहे. शाळा सुरू होण्यापासूनच याची योग्य अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मदत मिळेल. वह्या-पुस्तकांच्या वजनाचा परिणाम साधारणपणे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अधिक पडतो. शाळांनी या बाबत लवकरच निर्णय घेतला तर विद्यार्थीच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे आता शाळांसमोर शैक्षणिक सत्र प्रारंभ होण्यापूर्वी हे ओझे कमी कसे करता येईल, हा निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून शाळा कोणता मार्ग निवडतात, याकडे पालकांचे लक्ष आहे.