शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
5
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
6
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
7
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
8
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
9
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
10
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
11
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
12
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
13
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
14
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
15
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
16
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
17
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
18
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
19
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
20
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

दप्तरातील ओझे कमी करण्याचे आव्हान

By admin | Updated: June 13, 2016 01:49 IST

लगबग सुरू : २७ जून रोजी वाजणार शाळेची पहिली घंटा!

बुलडाणा : शासनाच्यावतीने यावर्षी २७ जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर पुन्हा बालकांच्या पाठीवरील ओझे वाहण्याच्या नियमित प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बालकांच्या पाठीवरील हे ओझे कमी व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध निर्णय घेण्यात आले, तशा सूचना संबंधित शाळेला देण्यात आल्या आहेत. मात्र हे ओझे अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांसमोर आता दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शैक्षणिक वर्ष प्रारंभ होण्यापूर्वी शाळा या बाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हय़ात लवकरच शाळांना सुरुवात होत आहे. पहिलीतील मुलांच्या दप्तराचे ओझे दोन किलो आणि आठवीतील मुलांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोग्रॅमपेक्षा जास्त असू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाच्या समितीने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. असे असले तरीही शाळेच्यावतीने कोणतेही नियोजन होत नसल्याने दरवर्षी हे ओझे बालकांना वाहावे लागत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशापेक्षा दुप्पट, तर काही ठिकाणी तिप्पट वजन बालकांच्या पाठीवर आढळून येते. परिणामी कोवळ्या वयाच्या बालकांच्या पाठीच्या कण्यावर ताण पडत आहे. प्रमाणाबाहेर वजनदार दप्तरांमुळे मुलांना मानेच्या व पाठीच्या स्नायूचे विकार, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण येणे, यासारखे विकार होऊ शकतात. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १0 टक्के वजन दप्तराचे असावे, असे शासकीय अहवालात सुचवले आहे. शाळा सुरू होण्यापासूनच याची योग्य अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मदत मिळेल. वह्या-पुस्तकांच्या वजनाचा परिणाम साधारणपणे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अधिक पडतो. शाळांनी या बाबत लवकरच निर्णय घेतला तर विद्यार्थीच्या पाठीवरील ओझे कमी होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे आता शाळांसमोर शैक्षणिक सत्र प्रारंभ होण्यापूर्वी हे ओझे कमी कसे करता येईल, हा निर्णय घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. यातून शाळा कोणता मार्ग निवडतात, याकडे पालकांचे लक्ष आहे.