शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:56 IST

खामगाव :  शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का  जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्दे खा.राजू शेट्टी यांचे नेतृत्व जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांचा सहभागरस्त्यावरच खाल्ल्या आंदोलकांनी भाकरी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का  जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिलेले आश्‍वासन न पाळल्याने त्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकरी नेते खा.राजू शेट्टी यांनी केला. शेतकर्‍यांची विनाअट सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतमालास भाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने दुसर्‍या टप्प्यातील आक्रमक आंदोलनास सोमवार १४ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत टेंभूर्णा फाट्यावर खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, सुकाणू समितीचे निमंत्रक कॉ.दादा रायपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, जितेंद्र चोपडे, राणा चंदन, रवी महाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना खा.शेट्टी म्हणाले की, आपण कृषिमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न विचारणार आहोत की, मोदी यांनी निवडणुकीत फक्त शेतकर्‍यांची मते मिळविण्यासाठी खोटी आश्‍वासने दिलीत की, शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांना कळलेलेच नाहीत. या दोनपैकीच एक खरे असू शकते. मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातमध्ये शेतीची प्रगती झाली म्हणून ते देशातही शेती व शेतीला प्रगतीपथावर  नेतील, असे वाटले होते; पण त्यांनी शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही, असा गर्भित इशाराही शेट्टी यांनी दिला. आम्ही आमचा हक्क मागतोय. तुम्ही तीन वर्षांपासून आश्‍वासन पाळले नाही म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय. आमच्या न्याय्य हक्कांसाठी आता सर्वांशी दोन हात करण्याची आमची तयारी आहे. एनडीएच्या एवढय़ा जागा आल्यात त्या केवळ शेतकर्‍यांमुळेच. शेतकर्‍यांचे प्रेम तुम्ही पाहिलेत आता त्यांचा रागही पाहा, असे ते म्हणाले. यावेळी ना. रविकांत तुपकर म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची भीक मागत नसून तो त्यांचा हक्क आहे. या कर्जमाफीच्या मागणीला सैद्धांतिक अधिष्ठान आहे. शासनाकडून अपेक्षाभंग झाल्याने त्याच्याविरुद्ध लढा देण्याची वेळ आली. सरकारविरुद्धची खरी लढाई आता सुरु झाली आहे. शेतकर्‍यांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे आता सत्तेची गुर्मी व मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. परिणामी, वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 

रस्त्यावरच खाल्ल्या आंदोलकांनी भाकरीआंदोलनाच्या शेवटी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी सोबत आणलेल्या ठेचा- भाकरी  रस्त्यावर बसून खाल्ल्या. यावेळी खा.राजू शेट्टी, ना. रविकांत तुपकर आदींनीसुद्धा ठेचा -भाकर खावून शेतकर्‍यांना साथ दिली. यावेळी सुमारे एक हजारपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.