शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

केंद्र सरकारने विश्‍वास संपादन केला - पात्रा

By admin | Updated: May 30, 2015 02:27 IST

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांची बुलडाणा येथे पत्रकार परिषद.

बुलडाणा: विकासाला केंद्रबिंदू मानून केंद्रातील मोदी सरकारने मागील एक वर्षात केलेल्या कामातून जनतेचा विश्‍वास संपादन केला, त्याबरोबरच मागील एनडीए सरकारने केलेले घोटाळे व भ्रष्टाचारातून देशाला मुक्ती मिळविण्यासाठी केलेले काम हे या सरकारची उपलब्धी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी शुक्रवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. त्यांनी काँग्रेसवर टीका करताना घोटाळेबाज सरकारने देशाचे वाटोळे केल्याचा आरोपही केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा बुलडाणा येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पात्रा म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर वर्षभरात एकही घोटाळा झाला नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली, परिणामी जगात देशाची छबी उजळून निघाली. स्वातंत्र्याच्या ६0 वर्षात ६0 टक्के जनता बँक प्रणालीच्या बाहेर होती. मोदी सरकारने एका वर्षात जनधन योजनेच्या माध्यमातून १५ कोटी लोकांचे बँक खाते उघडून आर्थिक समानता निर्माण केली. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील २0 टक्के लोकांनाच विमा मिळत होता. आता ७ कोटी लोक विमा योजनेत सहभागी झाले, ही अच्छे दिनची सुरूवात असल्याचा दावा त्यांनी केला. परदेशातील काळेधन असलेल्यांची नावे आता प्रसिद्ध होऊ लागली आहेत. लवकरच काळेधनसुद्धा परत येईल. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर बोलणे टाळत ते म्हणाले की, पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय अध्यक्ष यांचे मत व त्यांचा निर्णय हा अंतिम आहे. या विषयावर आपण अधिक बोलणार नाही. भाजप छोट्या राज्याचे सर्मथक आहे, यावर त्यांनी मात्र संमती दर्शविली. नेपाळचा भूकंप असो की काश्मीरचा महापूर असो, घटनेच्या काही तासात पीडिताना मदतीचा हात देण्याचे काम सरकारने केले. मोदी सरकारची विदेश नीती, केंद्र व राज्य सरकारातील समन्वय, मंत्री व पंतप्रधान यांच्यातील संवाद यामधून सरकारला चांगली कामे करता आली. त्यातूनच केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा विश्‍वास संपादन केल्याचा दावा पात्रा यांनी केला. पत्रकार परिषदेला आ. चैनसुख संचेती, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे, भाजप नेते योगेंद्र गोडे उपस्थित होते.