शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

ओबीसींची जातनिहाय जनगणना लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

स्थानिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी गोर सेनेच्या वतीने मागील चार दिवसांपासून ...

स्थानिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी गोर सेनेच्या वतीने मागील चार दिवसांपासून

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस उजाडला आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी संदेश चव्हाण म्हणाले की, स्थानिक

स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही करावी. मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयुक्त पूर्व परीक्षेचे सर्व परीक्षेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करावे, बार्टीच्या धरतीवर महाज्योतीला तीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सुुरू करून जिल्हाध्यक्षांची नेमणूक तत्काळ करावी, यूजीसीच्या निर्देशानुसार समर्थ आरक्षण कायदा २०१९ लागू करून महाविद्यालय व विद्यापीठ एकक मानून प्राध्यापक भरती सुरू करावी, नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा नियुक्त अधिनियमन १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास गोर सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत सेनेच्या वतीने राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर याच मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला विविध स्तरावर पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती संदेश चव्हाण यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये अमरावतीचे विभागी अध्यक्ष सोनू चव्हाण, बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद राठोड, बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश राठोड, अखिल भारतीय चर्मकार संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. डी.आर. माळी, बुलडाणा तालुका अध्यक्ष प्रमोद राठोड, तालुका सचिव विशाल जाधव, मोताळा तालुका प्रसिद्धीप्रमुख विशाल राठोड आदींची उपस्थिती होती.