शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मोफत पास योजनेची मुदत संपल्याने विद्यार्थिनी अडचणीत

By admin | Updated: March 25, 2017 02:37 IST

३१ मार्चला मुदत संपणार: एप्रिल महिन्यात परीक्षा

हर्षनंदन वाघबुलडाणा, दि. २४- एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. याशिवाय अहल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजनेंतर्गत शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात किंवा बाहेरगावी जाणार्‍या विद्यार्थिनींसाठी एसटी बसने मोफत प्रवासाची सोय करण्यात आली; मात्र मोफत पासची मुदत ३१ मार्च रोजी संपणार असल्याने व एप्रिल महिन्यात परीक्षा असल्यामुळे या योजनेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थिनींच्या पुढे अडचण उभी राहिली आहे.शहर परिसरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थिनींना बसच्या पाससाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागत होते. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना लागू केली. ही योजना १९९६ पासून लागू करण्यात आली असून, या योजनेत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे. यावर्षी शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवासाची सुविधा ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे; मात्र परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मोफत प्रवासाची सुविधा घेणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी अडचणीत आल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाने विद्यार्थिनींना मोफत प्रवासासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित शाळेने प्रस्ताव सादर करावा!अहल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत प्रवास योजना एप्रिल महिन्यात परीक्षा काळात सुरू ठेवण्यासाठी संबंधित शाळेने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पत्रासह प्रस्ताव सादर केल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती बुलडाणा आगार प्रमुख दीपक साळवे यांनी दिली.

सदर योजनेस ३१ मार्चनंतरही मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्यात परीक्षा असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होईल.-अ.ज. सोनवणे, माध्यमिक, शिक्षणाधिकारी, बुलडाणा