शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

जिल्ह्यात ५०० कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी; चार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी चार जण पाॅझिटिव्ह आले आहेत. मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक व उमेदवारांची संख्या जास्त असल्याने काेराेना चाचणीला फाटा देण्यात आला आहे.

काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हाेत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी व उमेदवारांची काेराेना चाचणी करणे अपेक्षित हाेते. मात्र, जिल्ह्यात तब्बल ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. तसेच दाेन दिवसात माेठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची काेराेना चाचणी करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. मतदान केंद्रावरही माेठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार असल्याने त्यांची काेराेना चाचणी करणे तसेच अहवाल येण्यास बराच विलंब झाला असता. उमेदवारांसाठी काेराेनाचा चाचणी ऐच्छिक हाेती. जिल्ह्यातील काही उमेदवारांनी काेराेना चाचणी केली आहे. काहींनी मात्र काेराेना चाचणीस नकार दिला आहे.

मतदान केंद्रावर सॅनिटायझर राहणार

काेराेना संसर्गाचा धाेका पाहता जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मास्कही देण्यात येणार आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून निवडणूक पार पाडण्यात येणार आहे. निवडणूकविषयक झालेल्या प्रशिक्षणांमध्ये याविषयी सर्वच तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १९८३ मतदान केंद्र

जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत. त्यामुळे आता ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एक हजार ९८३ मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यातील १८७ प्रभाग अविराेध झाले. रिंगणातील १० हजार १५१ पैकी ८७५ सदस्य अविराेध झाले असून, जिल्ह्यात नऊ हजार २७६ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.