शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

काेराेनामुळे इतर आजारांचे ५० टक्के रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST

बुलडाणा : मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर इतर आजारांचे रुग्ण ५० टक्यांनी घटल्याचे चित्र आहे. सन २०१८ ते ...

बुलडाणा : मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर इतर आजारांचे रुग्ण ५० टक्यांनी घटल्याचे चित्र आहे. सन २०१८ ते २०२०ची तुलना केल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मार्च महिन्यानंतर माेठ्या प्रमाणात घटली आहे.

काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर नागरिकांमध्ये आराेग्यविषयक जागृती वाढली आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदींसह इतर खबरदारीचे उपाय केल्याने अन्य आजारांचा त्रास कमी झाला. तसेच एरव्ही दुर्लक्षित असलेल्या सर्दी, खाेकला आणि तापाकडे काेराेनाच्या भीतीने जास्तच लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०२०च्या जानेवारी महिन्यात २१ हजार ४४१ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले हाेते. एप्रिलमध्ये लाॅकडाऊन असल्यामुळे व काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केवळ ४ हजार २०१ रुग्णांनी उपचार घेतले. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून विविध उपाययाेजना नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मास्कचा नियमित वापर करण्यात येत असल्याने अनेक आजारांपासून नागरिकांचे संरक्षण हाेत आहे. काेराेना संसर्गामुळे नागरिक स्वच्छतेविषयी अधिक जागरुक झाले आहेत. त्यामुळे ऑक्टाेबर महिन्यात केवळ ८ हजार ३४१ रुग्णांना उपचार घेण्याची गरज भासली. राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठीही अनेकांनी प्रयत्न केल्याने रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे.

काेराेनाच्या भीतीने सरकारी रुग्णालयांकडे पाठ

काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरूवातीला भीतीचे वातावरण हाेते. सर्दी, खाेकला, ताप आला तरी नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत हाेते. आता हीच लक्षणे काेराेनाची असल्याने नागरिक सरकारी रुग्णालयांत जातच नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे अनेकजण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याला प्राधान्य देत असल्याने सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या घटली आहे.