शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सीएए लागू झाल्यास देशाची अखंडता धोक्यात - मुफ्ती अशफाक कासमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 17:58 IST

संविधान बचाव समिती खामगांवच्यावतीने शनिवारी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर ‘जनआक्रोश प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नागरिकता संशोधन कायदा केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर संसदेत पारीत केला. हा कायदा संविधानाचे उल्लंघन करणारा असून सदर कायदा देशात लागू केल्यास देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, असे  प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक मुफ्ती अशफाक कासमानी (अकोला) यांनी येथे केले.संविधान बचाव समिती खामगांवच्यावतीने शनिवारी स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर ‘जनआक्रोश प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुफ्ती अशफाक कासमानी बोलत होते. यावेळी मुफ्ती अशफाक म्हणाले की, भारत देश सर्वधर्म समभाव मध्ये विश्वास ठेवतो. इथे जाती, धर्माच्या आधारावर कोणालाही नागरीकता देणे किंवा काढणे भारतीय संविधानाचे उल्लंघन करण्या सारखे आहे. देशात एनआरसी, एनपीआर लागू झाल्यास सरकारला कागदपत्र देऊ नका, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.मंचावर मौलाना युनूस नदवी, मौलाना अनिस अशरफी, हाफिज अजमतउल्ला खान, सीपीएमचे सी.ए. जाधव, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अ‍ॅड. मनदीपसिंह चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे रवि महाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जितेंद्र चोपडे, काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, हाफिज सैय्यद सरफराज खान,  मौलाना सोहेल निजामी, आलीम सईद साहेब, मौसिकउल्ला खान साहेब, मौलाना युनूस साहेब, मौलाना अजमतउल्ला खान, अ‍ॅड. प्रशांत दाभाडे, मौलाना सिद्दीक, मौलवी खलील साहेब, मौलाना शकिल साहेब आदी उपस्थित होते.या ‘जनआक्रोश प्रदर्शन’ मध्ये सामिल होण्यासाठी शहरातील अनेक भागातून मुस्लिम समाजाचे जत्थे मैदानावर पोहोचताना दिसत होते. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा. उमर अहमद खान यांनी केले.  संचालन शरीफउल हसन यांनी केले. आभार  डॉ. वकार उल हक खान यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप मौलवी युनुस यांनी केलेल्या प्रार्थनेनंतर झाला. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी अशोक सोनोने यांनी उपस्थित मान्यवरांना संविधानाची पुस्तक भेट केली. कार्यक्रम पश्चात संविधान बचाव समितीचे प्रतिनिधी मंडलच्या सदस्यांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात निवेदन दिले. निवेदन देते वेळी समय मौलावी युनूस, मौलाना अनिस, हाफिज अजमतउल्ला खान, शोहरत खान, अजमल खान, डॉ. नवीद देशमुख, शेख अनिस, बुढन चौधरी, शेख रहेमान, नूरमोहम्मद शाह, मोहम्मद आरीफ पहेलवान, अब्दुल रशिद, गुलजमा शाह, सैय्यद वसीम, हाजी अलीमोद्दीन, शेख फारूक, मोहम्मद नईम आदि उपस्थित होते.

मुस्लिम समाजाने प्रतिष्ठान ठेवली बंदसंविधान बचाव समिती द्वारा आयोजित ‘जनआक्रोश प्रदर्शन’ मध्ये सहभागी होण्यासाठी मुस्लिम समाजाच्या लोकांनी  आपली प्रतिष्ठान बंद ठेवली.  शहराच्या मुस्लिम बाहुल्य असलेल्या बर्डे प्लॉट, मस्तान चौक, बोरीपूरा, हरीफैल, शंकर नगर तथा बसस्टँड आदी परिसरातील मुस्लिम समाजाने आपली प्रतिष्ठान बंद केली होती.