शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीमुळे बायपासचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: October 29, 2014 23:01 IST

मलकापूर येथे आधीच अरुंद रस्ते, त्यात जडवाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच.

हनुमान जगताप / मलकापूरविदर्भाचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्‍या मलकापूर नगरीत छोट्या व जडवाहनांमुळे रहदारी प्रचंड वाढली आहे. अशात जनसामान्य नागरिकांमध्ये बैचेनी वाढली असून, तालुक्यातील घिर्णी, दाताळा या बायपास मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील नवीन सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा शहरात व्यक्त होत आहे.मलकापूर येथील महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या तहसील चौक, हनुमान चौक, बसस्थानक चौक या ठिकाणी दिवसभरात किमान दहा वेळा चक्काजाम होतो. आठवडी बाजार आणि सणासुदीच्या काळात तर अक्षरशा वाहनांची रेलचेल असल्याने चक्काजाम दिवसभरात अनेकदा होतो. शहरात नांदुरा, मुक्ताईनगर व बुलडाणा, बोदवड या चार ठिकाणावरून वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात बाहेरून येणारी वाहने अन शहरातील वाहने यांची संख्या पाहता, प्रत्येक चौकात वाहनांची अन वाहनांचीच भाऊगर्दी निदर्शनास येते. त्यामुळे शहरातील मुख्य चौकात दिवसातून अनेकदा चक्काजामचा अनुभव नागरिक घेतात, हे वास्तव आहे. यात प्रामुख्याने जड वाहने, जी मुंबई, नागपूर, जालना, औरंगाबाद या ठिकाणावरून ये-जा करतात, त्यांचाही मोठा सहभाग आहे. जर मलकापूर तालुक्यातील बेलाड-घिर्णी व दाताळा या दरम्यानच्या बायपास रस्त्याची निर्मिती झाल्यास शहरातील रहदारीवरचा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो. शहरात पोलिसांची ट्राफिक यंत्रणा काम करते, हे जरी खरं असलं तरी वाहनांची भाऊगर्दी रोखण्यासाठी मलकापूर तालुक्यात घिर्णी बायपास रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यातील नवीन सरकारने तातडीने बायपासचा प्रश्न मार्गी लावून शहरातील वाहतुकीचा कोंडी सोडवावी, अशीे शहरातील जनसामान्यांची शहरातील सुज्ञ लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.