शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बुलडाणा जिल्ह्यात नाफेडकडून दोन लाख क्विंटल धान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:29 IST

शेगाव:  खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल राहिले असून, उडीद खरेदीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.  

ठळक मुद्देमूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल तर उडीद खरेदीत द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:  खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल राहिले असून, उडीद खरेदीत दुसर्‍या क्रमांकावर आहे.  राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने सूचित केल्याप्रमाणे हंगाम २0१७-१८  मध्ये नाफेडच्या शेगाव, चिखली, मेहकर, दे. राजा, संग्रामपूर, बुलडाणा, सिं. राजा, मोताळा, मलकापूर, खामगाव, लोणार, नांदुरा, जळगाव जामोद या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी तेलबिया व कडधान्य विक्रीसाठी आणले होते. यामध्ये शेगाव केंद्र- उडीद ३२ हजार ७६९.७५ क्विंटल, चिखली- ४६ हजार ९४२.७0, मेहकर-१९ हजार ५६.0५, दे. राजा- एक हजार ८११.७८, संग्रामपूर- १ हजार ३४७.१७, बुलडाणा- ८ हजार ७८८.३६, सिं. राजा- ५ हजार ३९0.७४, मोताळा-१ हजार ४५२.७0, मलकापूर-२ हजार ८१0.५0, खामगाव-२४ हजार २४९.५0, लोणार-४ हजार ७६0.२१, नांदुरा- ३ हजार ३२२.६0, जळगाव जामोद-९८१.१६ असा एकूण  १ लाख ५२ हजार ९६९.६२ क्विंटल उडीद खरेदी करण्यात आला. मूग - शेगाव-५ हजार ४६0.९५  क्विंटल, चिखली- २ हजार ६.३३, मेहकर-१ हजार ५९0.१८, दे. राजा- ५५८.५0, संग्रामपूर- ३१0.३५, बुलडाणा- १४५.६८, सि. राजा- ७३८.३३, मोताळा- ६७७.४0, मलकापूर- ११ क्विंटल, खामगाव- १ हजार ३१४.३९, लोणार- २ हजार १९३.३५, नांदुरा- ४५७, जळगाव जामोद- ५६६.२0 अशी एकूण १६ हजार ७९.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. सोयाबीन शेगाव केंद्र, ३ हजार ८७३.३0 क्विंटल, चिखली- ६0२.२२, मेहकर- ७८६.0६, दे. राजा-१ हजार १७0.७२, संग्रामपूर- एक हजार ५0 , बुलडाणा- ६४.८१, सि. राजा- ३७२.११, मोताळा ८११.७0, मलकापूर- ५ हजार ७४७.३0, खामगाव- ८ हजार ९५३.३४, लोणार- ५१८.७२, नांदुरा- १ हजार ४५५.५0, जळगाव जामोद- ७९९.३९ असा एकूण २६ हजार २0५.१७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. मका खरेदी केंद्र-शेगाव केंद्र- १0७.४0 क्विंटल, संग्रामपूर-२ हजार १३६.५0, मोताळा- २७७.५0, मलकापूर- ६ हजार ६८, नांदुरा- ३९६, जळगाव जामोद- २ हजार ६५७ क्विंटल असा एकूण ११ हजार ६४२.४0 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. हंगाम २0१७-१८ मध्ये केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या हमी भावाने मूग- ५ हजार ५७५ रुपये, उडीद- ५४00 रु. प्रति क्विंटलप्रमाणे व सोयाबीन- ३ हजार ५0 रु प्रति क्विंटलप्रमाणे दि. महाराष्ट्र स्टेट  को-ऑपरेटिव्ह  मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अंतर्गत नाफेडच्या वतीने १३ तालुक्यातील तेलबिया व कडधान्य हा शेतमाल खरेदी केला असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी  पी. एस. शिंगणे  यांनी सांगितले.

ऑनलाइन प्रक्रियेने काम सोपेया करिता ३ ऑक्टोबर २0१७ पासून माल खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. ३१ डिसेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यात २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल तेलबिया व कडधान्याची खरेदी झाली. 

शेगावात आणखी शेतमाल पडून अद्यापही शेगाव नाफेड गोदामात १२ हजार क्विंटल उडीद, ३ हजार क्विंटल मूग, ४.५0 क्विंटल साोयाबीनचा माल पडून असल्याचे खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक ताठे यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा