शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शंभरच्या नोटांद्वारे सोयाबीन खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 02:50 IST

अडचणीपोटी शेतक-यांचा नाईलाज; व्यापा-यांकडून शेतकर्‍यांची लूट.

खामगाव, दि. १३- ऐन सोयाबीन विक्रीच्या काळात पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गरजेपोटी सोयाबीन विकावे लागत असून, व्यापार्‍यांकडून शंभरच्या नोटांद्वारे प्रतिक्विंटल ४00 ते ५00 रुपये दराने कमी भाव मिळत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीला आणले असता शेतकर्‍यांना शंभराच्या पूर्ण नोटा मिळत नाही. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत सद्यस्थिती शेतमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांना शंभराच्या नोटांसाठी थांबावे लागत आहे. त्यामुळे चेकद्वारे शेतकर्‍यांना सोयाबीन विक्रीची रक्कम अदा केली जात असल्याचे चित्र आहे. नेमके याच संधीचा फायदा घेत ग्रामीण भागात व्यापार्‍यांनी सोयाबीन खरेदीसाठी मोर्चा वळविला आहे. शेतकर्‍यांना दैनंदिन खर्चाकरिता तसेच इतर रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी गहू, हरभरा, खते खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे. सोयाबीन विक्रीशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही. तेव्हा व्यापार्‍यांनी थेट गावात सोयाबीन खरेदी सुरु केली. शंभरच्या नोटा देऊन सोयाबीन खरेदी होत असताना क्विंटलमागे ४00 ते ५00 रुपये कमी दर व्यापार्‍यांकडून देण्यात येत आहे. एकप्रकारे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांजवळ पर्याय नसल्याने २000 ते २२00 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.