शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या शहराचा भार केवळ पाच जलकुंभांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची ...

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची निर्मिती केली; परंतु अद्याप या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. या जलकुंभातून पाणी पुरवठा झाल्यास चिखलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने पालिकेने त्यानुषंगाने नियोजन करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार केवळ पाच जलकुंभांवर आहे.

चिखली शहराला सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पावरून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही शहरवासीयांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक वेळा १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पाणीबाणीची स्थिती उद्भवते. त्यात कधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी उपसा करणाऱ्या मोटारींमध्ये बिघाड, तर कधी जलवाहिनीला गळती आदी तांत्रिक कारणांमुळे शहरवासीयांना सातत्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. पालिकेची जुनाट व सदोष वितरण व्यवस्था शहर पाणी पुरवठ्याची मोठी अडचण असल्याचे रडगाने सातत्याने गायले जाते; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कोणी फारसे उत्सुक नाहीत.

कार्यान्वित असलेल्या जलकुंभांची क्षमता

जलशुद्धी केंद्रात पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर शहरात त्याचे वितरण करण्यासाठी पालिकेकडे आज रोजी साठवणुकीसाठी ५ जलकुंभ आहे. यातील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जुनी टाकी : क्षमता १२ लाख लिटर, शिवाजी उद्यान टाकी ४.५ लाख लिटर, पुंडलीक नगर टाकी ३.५ लाख लिटर, जाफ्राबाद रोड टाकी ३.५ लाख लिटर, रोहिदास नगरमधील टाकी ५ लाख लिटर क्षमतेचे एकूण ५ जलकुंभ आहेत. याची एकूण साठवण क्षमता २८.५ लाख इतकी आहे.

महामार्गाखाली दबला जलवाहिनीचा व्यास !

पेनटाकळी प्रकल्पावरून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविणारी जलवाहिनी नवीन महामार्गाखाली दबल्या गेली आहे. जलवाहिनीवर दबाव वाढल्याने त्याचा व्यासदेखील कमी झाला आहे. परिणामी, जिथे पूर्वी १०० लिटर पाणी पोहोचत होते तेथे आता केवळ ५५ लिटर पाणी या जलवाहिनीद्वारे पोहोचत असल्यानेदेखील शहराचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.

४४ कोटींचा नवीन प्रस्ताव !

शहराची पाइपलाइन १९९९ सालाची असून, ती आता कालबाह्य ठरत आहे. यानुषंगाने पालिकेद्वारे स्थानिक वायझडी धरणावरून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे टेंडरदेखील आहे. तर ४४ कोटींचा नवीन प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र, तीन नवीन जलकुंभ आणि पाइपलाइनचा समावेश आहे.

वायझडी धरणावरून पाणी पुरवठ्याचे टेंडर झाले आहे. नवीन प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. याद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना ६ व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे.

अभिजीत वायकोस

मुख्याधिकारी, न.प.चिखली.