शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

अवघ्या शहराचा भार केवळ पाच जलकुंभांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची ...

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची निर्मिती केली; परंतु अद्याप या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. या जलकुंभातून पाणी पुरवठा झाल्यास चिखलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने पालिकेने त्यानुषंगाने नियोजन करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार केवळ पाच जलकुंभांवर आहे.

चिखली शहराला सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पावरून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही शहरवासीयांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक वेळा १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पाणीबाणीची स्थिती उद्भवते. त्यात कधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी उपसा करणाऱ्या मोटारींमध्ये बिघाड, तर कधी जलवाहिनीला गळती आदी तांत्रिक कारणांमुळे शहरवासीयांना सातत्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. पालिकेची जुनाट व सदोष वितरण व्यवस्था शहर पाणी पुरवठ्याची मोठी अडचण असल्याचे रडगाने सातत्याने गायले जाते; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कोणी फारसे उत्सुक नाहीत.

कार्यान्वित असलेल्या जलकुंभांची क्षमता

जलशुद्धी केंद्रात पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर शहरात त्याचे वितरण करण्यासाठी पालिकेकडे आज रोजी साठवणुकीसाठी ५ जलकुंभ आहे. यातील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जुनी टाकी : क्षमता १२ लाख लिटर, शिवाजी उद्यान टाकी ४.५ लाख लिटर, पुंडलीक नगर टाकी ३.५ लाख लिटर, जाफ्राबाद रोड टाकी ३.५ लाख लिटर, रोहिदास नगरमधील टाकी ५ लाख लिटर क्षमतेचे एकूण ५ जलकुंभ आहेत. याची एकूण साठवण क्षमता २८.५ लाख इतकी आहे.

महामार्गाखाली दबला जलवाहिनीचा व्यास !

पेनटाकळी प्रकल्पावरून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविणारी जलवाहिनी नवीन महामार्गाखाली दबल्या गेली आहे. जलवाहिनीवर दबाव वाढल्याने त्याचा व्यासदेखील कमी झाला आहे. परिणामी, जिथे पूर्वी १०० लिटर पाणी पोहोचत होते तेथे आता केवळ ५५ लिटर पाणी या जलवाहिनीद्वारे पोहोचत असल्यानेदेखील शहराचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.

४४ कोटींचा नवीन प्रस्ताव !

शहराची पाइपलाइन १९९९ सालाची असून, ती आता कालबाह्य ठरत आहे. यानुषंगाने पालिकेद्वारे स्थानिक वायझडी धरणावरून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे टेंडरदेखील आहे. तर ४४ कोटींचा नवीन प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र, तीन नवीन जलकुंभ आणि पाइपलाइनचा समावेश आहे.

वायझडी धरणावरून पाणी पुरवठ्याचे टेंडर झाले आहे. नवीन प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. याद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना ६ व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे.

अभिजीत वायकोस

मुख्याधिकारी, न.प.चिखली.