शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

अवघ्या शहराचा भार केवळ पाच जलकुंभांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची ...

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची निर्मिती केली; परंतु अद्याप या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. या जलकुंभातून पाणी पुरवठा झाल्यास चिखलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने पालिकेने त्यानुषंगाने नियोजन करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार केवळ पाच जलकुंभांवर आहे.

चिखली शहराला सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पावरून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही शहरवासीयांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक वेळा १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पाणीबाणीची स्थिती उद्भवते. त्यात कधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी उपसा करणाऱ्या मोटारींमध्ये बिघाड, तर कधी जलवाहिनीला गळती आदी तांत्रिक कारणांमुळे शहरवासीयांना सातत्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. पालिकेची जुनाट व सदोष वितरण व्यवस्था शहर पाणी पुरवठ्याची मोठी अडचण असल्याचे रडगाने सातत्याने गायले जाते; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कोणी फारसे उत्सुक नाहीत.

कार्यान्वित असलेल्या जलकुंभांची क्षमता

जलशुद्धी केंद्रात पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर शहरात त्याचे वितरण करण्यासाठी पालिकेकडे आज रोजी साठवणुकीसाठी ५ जलकुंभ आहे. यातील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जुनी टाकी : क्षमता १२ लाख लिटर, शिवाजी उद्यान टाकी ४.५ लाख लिटर, पुंडलीक नगर टाकी ३.५ लाख लिटर, जाफ्राबाद रोड टाकी ३.५ लाख लिटर, रोहिदास नगरमधील टाकी ५ लाख लिटर क्षमतेचे एकूण ५ जलकुंभ आहेत. याची एकूण साठवण क्षमता २८.५ लाख इतकी आहे.

महामार्गाखाली दबला जलवाहिनीचा व्यास !

पेनटाकळी प्रकल्पावरून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविणारी जलवाहिनी नवीन महामार्गाखाली दबल्या गेली आहे. जलवाहिनीवर दबाव वाढल्याने त्याचा व्यासदेखील कमी झाला आहे. परिणामी, जिथे पूर्वी १०० लिटर पाणी पोहोचत होते तेथे आता केवळ ५५ लिटर पाणी या जलवाहिनीद्वारे पोहोचत असल्यानेदेखील शहराचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.

४४ कोटींचा नवीन प्रस्ताव !

शहराची पाइपलाइन १९९९ सालाची असून, ती आता कालबाह्य ठरत आहे. यानुषंगाने पालिकेद्वारे स्थानिक वायझडी धरणावरून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे टेंडरदेखील आहे. तर ४४ कोटींचा नवीन प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र, तीन नवीन जलकुंभ आणि पाइपलाइनचा समावेश आहे.

वायझडी धरणावरून पाणी पुरवठ्याचे टेंडर झाले आहे. नवीन प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. याद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना ६ व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे.

अभिजीत वायकोस

मुख्याधिकारी, न.प.चिखली.