शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या शहराचा भार केवळ पाच जलकुंभांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची ...

चिखली : अनेक वर्षांपासून चिखली शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यावर उपाय म्हणून पालिकेच्यावतीने नवीन जलकुंभाची निर्मिती केली; परंतु अद्याप या नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. या जलकुंभातून पाणी पुरवठा झाल्यास चिखलीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने पालिकेने त्यानुषंगाने नियोजन करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार केवळ पाच जलकुंभांवर आहे.

चिखली शहराला सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पावरून पाणी पुरवठा होतो. या प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध असतानाही शहरवासीयांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक वेळा १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने शहरात पाणीबाणीची स्थिती उद्भवते. त्यात कधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी उपसा करणाऱ्या मोटारींमध्ये बिघाड, तर कधी जलवाहिनीला गळती आदी तांत्रिक कारणांमुळे शहरवासीयांना सातत्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. पालिकेची जुनाट व सदोष वितरण व्यवस्था शहर पाणी पुरवठ्याची मोठी अडचण असल्याचे रडगाने सातत्याने गायले जाते; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी कोणी फारसे उत्सुक नाहीत.

कार्यान्वित असलेल्या जलकुंभांची क्षमता

जलशुद्धी केंद्रात पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर शहरात त्याचे वितरण करण्यासाठी पालिकेकडे आज रोजी साठवणुकीसाठी ५ जलकुंभ आहे. यातील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जुनी टाकी : क्षमता १२ लाख लिटर, शिवाजी उद्यान टाकी ४.५ लाख लिटर, पुंडलीक नगर टाकी ३.५ लाख लिटर, जाफ्राबाद रोड टाकी ३.५ लाख लिटर, रोहिदास नगरमधील टाकी ५ लाख लिटर क्षमतेचे एकूण ५ जलकुंभ आहेत. याची एकूण साठवण क्षमता २८.५ लाख इतकी आहे.

महामार्गाखाली दबला जलवाहिनीचा व्यास !

पेनटाकळी प्रकल्पावरून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचविणारी जलवाहिनी नवीन महामार्गाखाली दबल्या गेली आहे. जलवाहिनीवर दबाव वाढल्याने त्याचा व्यासदेखील कमी झाला आहे. परिणामी, जिथे पूर्वी १०० लिटर पाणी पोहोचत होते तेथे आता केवळ ५५ लिटर पाणी या जलवाहिनीद्वारे पोहोचत असल्यानेदेखील शहराचा पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे.

४४ कोटींचा नवीन प्रस्ताव !

शहराची पाइपलाइन १९९९ सालाची असून, ती आता कालबाह्य ठरत आहे. यानुषंगाने पालिकेद्वारे स्थानिक वायझडी धरणावरून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे टेंडरदेखील आहे. तर ४४ कोटींचा नवीन प्रस्तावदेखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र, तीन नवीन जलकुंभ आणि पाइपलाइनचा समावेश आहे.

वायझडी धरणावरून पाणी पुरवठ्याचे टेंडर झाले आहे. नवीन प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. याद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना ६ व्या दिवशी पाणी पुरवठा होणार आहे.

अभिजीत वायकोस

मुख्याधिकारी, न.प.चिखली.