शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा ...

बुलडाणा : कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा असून, शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीन वाढला आहे. दहावीची परीक्षा २३ तर बारावीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट स्टीकर, सिटिंग प्लान, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामध्ये दहावीची परीक्षा तर रद्दच करण्यात आली आहे. बारावी परीक्षेच्या पुढील तारखा अद्यापही निश्चित नाहीत. त्यामुळे शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्यस्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य जोखमीचे असल्यामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळांची स्थिती चांगली आहे. मात्र, चोरांची नजर जर या साहित्याकडे गेली तर काय होईल, या भीतीने सध्या तरी मुख्याध्यापकांची झोप उडाली आहे. कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शाळा बंद आहे. अशावेळी शाळेत जाणेही मुख्याध्यापक, शिक्षकांना कठीण झाले आहे.

दहावीतील विद्यार्थी - ३९,६५८

बारावीतील विद्यार्थी - ३१,०२४

हे साहित्य कस्टडीत

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट स्टीकर, सिटिंग प्लान, ए. बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य, आदी.

परीक्षा कधी?

पुढील प्रवेश कधी?

१. परीक्षेच्या तारखा कधी घोषित होणार? पुढील प्रवेश कधी होणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत.

२. शिक्षण विभागाने आता दहावीची परीक्षा रद्द केल्याने पुढील प्रवेश नेमका कोणत्या मूल्यांकनावर मिळणार, याचा संभ्रम पालकांमध्ये आहे.

३. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. आता बारावीच्या परीक्षेचे नेमके काय होतेय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

मुख्याध्यापक म्हणतात...

दहावी बोर्डाच्या परीक्षेचे साहित्य १२ एप्रिलला मिळाले होते. हे सर्व साहित्य सांभाळणे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. आपण सर्व साहित्य व्यवस्थित कुलूपबंद ठेवलेले आहे. आता दहावीच्या परीक्षाच रद्द झाल्यामुळे बोर्डाचे जे आदेश येतील, त्यानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.

- सुरेश हिवरकर, मुख्याध्यापक,

बाबुराव पाटील विद्यालय, लोणी गवळी.