शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बुलडाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्य वाहतूकीला घरघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:57 IST

काही राशन दुकानांमध्ये चार ते पाच दिवसांपासून धान्य पोहचले नसल्याने जिल्ह्यातील धान्य वाहतूकीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत होणाऱ्या धान्य वितरणासाठी धान्याची वाहतूक सध्या पर्यायी व्यवस्थेवर सुरू आहे. त्यामुळे धान्य वेळेवर पोहचण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही राशन दुकानांमध्ये चार ते पाच दिवसांपासून धान्य पोहचले नसल्याने जिल्ह्यातील धान्य वाहतूकीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. सध्या सुधारीत धान्य वितरण पद्धतीनुसार धान्याची वाहतूक व गोदामस्तरावरील हाताळणूक करण्यासाठी कंत्राट निश्चित करण्याच्या हालचाली सुरू असून लवकरच कंत्राट निश्चित होणार आहे.भारतीय अन्न महामंडळ गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत जिल्हावार एकाच वाहतूक दारामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्यात येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य वाहतूकीसाठी जिल्ह्याला जवळपास २६ वाहने लागतात. परंतू जिल्ह्यात पुरवठा विभागांतर्गत होणाºया धान्य वाहतूकीचा कंत्राट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव डिसेंबर २०१८ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार कंत्राट रद्द झाल्याने धान्य वाहतूकीसाठी अडचणी येऊ नये, याकरीता अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी सात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे दरपत्रक आले होते. त्याची पडताळणी करून जिल्ह्यातील धान्य वातूकीसाठी पर्यायी व्यवस्था जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेली आहे. परंतू या पर्यायी व्यवस्थेमध्ये नियोजनाचा अभाव, वाहनांची कमतरता, अटी व नियमांचा भडीमार यासारख्या अनेक कारणांमुळे धान्य वितरणाला फटका बसत आहे. वेळेवर धान्य पोहचत नसल्याची ओरड रास्त भाव दुकानदारांमधून होत आहे. तात्पुरत्या स्वरूपातील ही पर्यायी वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरत असल्याने गोरगरीबांना सण, उत्सवाच्या काळात धान्यापासून वंचीत राहावे लागत आहे.आता सुधारीत धान्य वितरण पद्धतीनुसार धान्य वाहतूक व गोदामस्तरावरील हाताळणूक करून धान्य रास्त भाव दुकानात पोचविण्याचा कंत्राट निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी आॅनलाईन निविदा मागविणे व इतर प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

१९ सप्टेंबरला उघड होईल कंत्राटधान्य वाहतूकीचा कंत्राट निश्चित करण्यासाठी २७ आॅगस्टपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली. कंत्राटदारांसाठी २९ आॅगस्टपर्यंत ई-निवेदेची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पुरवठा विभागाच्या संकेस्थळावर नोंदणी करणे, अर्ज विक्री आदी बाबींचा समावेश होता. निविदा सादर करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत कंत्राटदारांना मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १९ सप्टेंबरला निविदा उघण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कंत्राट निश्चित करण्यात येणार आहे.

तीन वर्षाकरीता राहणार निश्चित कंत्राटभारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोपासून शासकीय धान्य गोदामापर्यंतची अन्नधान्याची वाहतूक, त्यानंतर शासकीय धान्य गोदामातील प्रमाणित केलेले धान्य रास्त भाव दुकानांमध्ये उतरविणे, यासाठी २०१९ ते २०२२ या वर्षासाठी कंत्राट निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन निश्चित कंत्राटही तीन वर्षासाठीच राहणार आहे.

सध्या जिल्ह्यातील धान्य वाहतूकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू ज्या ठिकाणी धान्य पोहचले नाही, त्या ठिकाणचा आढावा घेऊन धान्य वितरण करण्यात येईल. लवकरच धान्य वाहतूक व गोदामस्तरावरील हाताळणूक करून रास्तभाव दुकानात पोचविण्यासाठी कंत्राट निश्चित करण्यात येणार आहे.- गणेश बेलाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा